संरक्षणमंत्र्यांनी पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) गेली चार वर्षं चीनसोबत सुरू असणाऱ्या सीमावादाचाही उल्लेख केला आणि परिस्थितीचे सखोल विश्लेषण करण्याचे आवाहन केले.
“अमृतकाळात आपण आपली शांतता अबाधित ठेवणे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करून ,आपल्या सभोवतालच्या घडामोडींवर लक्ष ठेवले पाहिजे. त्यासोबतच भविष्यवेधी असण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.”
“यासाठी आपल्याकडे एक मजबूत आणि ठोस राष्ट्रीय सुरक्षा घटक असायला हवा. आपल्याकडे चोख प्रतिबंधात्मक यंत्रणा असायला हवी,” असे राजनाथ सिंह म्हणाले.
कमांडर्सनी सशस्त्र दलाच्या शस्त्रागारात पारंपरिक आणि आधुनिक युद्धसामग्रीचा समावेश करताना आवश्यकतेनुसार त्याचा योग्य प्रमाणात त्याचा संगम साधावा, असे आवाहनही संरक्षणमंत्र्यांनी केले.
अंतराळ आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमतेचा विकास आधुनिक काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी अत्यंत आवश्यक असून, त्यावर अधिक भर द्यायला हवा असे ते म्हणाले.
लष्करी नेतृत्वाने डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर द्यायला हवा असे आवाहन त्यांनी केले. “हे घटक कोणत्याही संघर्षात किंवा युद्धात थेट सहभागी होत नाहीत. त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग मोठ्या प्रमाणात युद्धाची दिशा ठरवत आहे.” ते पुढे म्हणाले.
“हे घटक कोणत्याही संघर्षात किंवा युद्धात थेट सहभागी होत नाहीत. त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग मोठ्या प्रमाणात युद्धाची दिशा ठरवत आहे,” असेही ते पुढे म्हणाले.
04 सप्टेंबर 2024 रोजी सुरू झालेल्या या परिषदेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, हवाई दल प्रमुख चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्यासह प्रमुख संरक्षण अधिकारी सहभागी झाले होते.
रवी शंकर