भारत एकाचवेळी रशिया-युक्रेन, इस्रायल-इराणशी संवाद साधू शकतो: जयशंकर

0
जयशंकर
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणतात, 'सबका साथ, सबका विकास' हे धोरण परराष्ट्र धोरणासाठीही खरे आहे. फोटो सौजन्यः एस. जयशंकर X पेज

‘बिझनेस टुडे व्ह्यूकॅनॉमिक्स 2025’ या कार्यक्रमात बोलताना, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, “सध्या जगात सुरू असलेल्या भू-राजकीय बदलांमध्ये भारत हा जगातील काही मोजक्या राष्ट्रांपैकी एक आहे, जो रशिया आणि युक्रेन तसेच इस्रायल आणि इराणशी एकाचवेळी संवाद साधण्यास सक्षम आहे.

“एक धोरणात्मक दृष्टिकोन विविध पर्याय वाढवण्यास देखील मदत करतो,” असेही जयशंकर यावेळी म्हणाले.

“सध्याच्या ध्रुवीकरणाच्या युगात, भारत काही निवडक राष्ट्रांपैकी एक आहे जो रशिया आणि युक्रेन, इस्रायल आणि इराण, डेमोक्रॅटिक वेस्ट आणि ग्लोबल साउथ तसेच ब्रिक्स आणि क्वाड या सर्वांना एकाचवेळी जोडू शकतो,” असे जयशंकर पुढे म्हणाले.

“आम्ही विशिष्ट अजेंड्यांना समर्पित असलेल्या 40 हून अधिक वेगवेगळ्या गटांची सुरुवात केली आहे किंवा त्यात सामील झालो आहोत, ज्यामध्ये अक्षय ऊर्जा आणि जैवइंधन ते आपत्ती लवचिकता आणि कनेक्टिव्हिटीपर्यंत विविध शाखांचा समावेश आहे,” असे त्यांनी नमूद केले.

संरक्षण आणि सुरक्षेसारख्या संवेदनशील क्षेत्रातही, भारताची राजकीय कुटनिती सुनिश्चित करते की, सशस्त्र दल आणि व्यवसाय दोघांनाही भागीदारांची विस्तृत निवड मिळेल.

“जेव्हा आंतरराष्ट्रीय सहकार्याचा विचार केला जातो, तेव्हा भारताने व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा किंवा सुरक्षा यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळे संयोजन तयार करण्याची क्षमता देखील दर्शवली आहे,” असे ते म्हणाले. “याद्वारे विविध संधींसाठी शक्य तितकी द्वारे खुली ठेवण्याचा प्रयत्न आहे. मी नेहमीच असे म्हटले आहे की ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र परराष्ट्र धोरणालाही तितकाच लागू होतो.”

व्यापार करार

जयशंकर म्हणाले की, “जागतिक आर्थिक सहभागात व्यापार करारांना महत्त्वाचे स्थान आहे आणि हे स्थान आता आणखी महत्त्वाचे झाले आहे, हे वास्तव भारताने ओळखले पाहिजे. सध्या, आम्ही तीन विशेषतः महत्त्वाच्या वाटाघाटींमध्ये गुंतलो आहोत – युरोपियन युनियन आणि युनायटेड किंग्डमसह FTI आणि युनायटेड स्टेट्ससह BTA. या आठवड्यातच, आम्ही न्यूझीलंडशीही वाटाघाटी सुरू केल्या आहेत. काही करार आधीपासूनच पाइपलाइनमध्ये आहेत.”

भारत आणि न्यूझीलंड यांनी गेल्या आठवड्यात मुक्त व्यापार कराराच्या (FTI) वाटाघाटी पुन्हा सुरू केल्या, ज्या 2015 पासून रखडल्या होत्या.

FTI वाटाघाटींचे उद्दिष्ट

भारत सरकारने यापूर्वी म्हटले होते की भारत-न्यूझीलंड एफटीए वाटाघाटी पुरवठा साखळी एकात्मता वाढविण्यासाठी आणि बाजारपेठेत प्रवेश सुधारण्यासाठी संतुलित परिणाम साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवतात.

“हा टप्पा मजबूत आर्थिक भागीदारीसाठी, लवचिकता आणि समृद्धीला चालना देण्यासाठी एक सामायिक दृष्टीकोन प्रतिबिंबित करतो,” असे निवेदनात म्हटले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने लादलेल्या परस्पर शुल्कापासून बचाव करण्यासाठी भारताकडून अमेरिकेशी जोरदार वाटाघाटी होण्याची अपेक्षा असताना, जयशंकर यांनीही असे भाष्य केले.

‘भारत प्रथम दृष्टिकोन’

जयशंकर म्हणाले की, त्यांचे सरकार ‘विकसित भारत’ दृष्टिकोन ध्येय ठेवून ‘भारत प्रथम दृष्टिकोनाचे’ अनुसरण करेल.

“अर्थातच, या संबंधांमधील अवास्तव क्षमतांचा वापर करण्याच्या शक्यतेवरही विचार केला जाईल. आमचे पूर्वीचे बहुतेक एफटीए आशियाई अर्थव्यवस्थांसोबत आहेत, ज्यांचे बरेच स्पर्धात्मक स्वरूप आहे. आखाती आणि पाश्चात्य अर्थव्यवस्थांना सहभागी करून एकंदर संतुलन आणणे हे केवळ आर्थिक तर्कशास्त्र नाही तर एक धोरणात्मक देखील आहे,” असे ते म्हणाले.

सबका साथ, सबका विकास

जयशंकर यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे ‘सबका साथ, सबका विकास’ धोरण परराष्ट्र धोरणाला देखील लागू पडते.

“आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या बाबतीत, आम्ही व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा किंवा सुरक्षा असो, वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळे संयोजन तयार करण्याची क्षमता देखील दाखवली आहे,” असे मंत्री पुढे म्हणाले. “शेवटच्या विश्लेषणात, शक्य तितके दरवाजे उघडे ठेवण्याचा प्रयत्न आहे. मी नेहमीच असे म्हटले आहे की ‘सबका साथ, सबका विकास’ हे परराष्ट्र धोरणालाही तितकेच लागू होते.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleBiosecurity in India: The Way Forward
Next articleImproving Surveillance Along Line Of Actual Control

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here