स्वावलंबन 3.0 चे संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

0
स्वावलंबन
स्वावलंबन 3.0 कार्यक्रमात भाषण करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

अदिती 3.0 अर्थात एसिंग डेवलपमेंट ऑफ इनोवेटिव्ह टेक्नॉलॉजीज् विथ आयडीईएक्सची तिसरी आवृत्ती आणि डिस्क 13 अर्थात डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंजेसच्या 13 व्या आवृत्तीचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली स्थित भारत मंडपम इथे 29 ऑक्टोबर 2024 रोजी नौवहन नवोन्मेष आणि स्वदेशीकरण संघटना – एनआयआयओच्या परिसंवादात करण्यात आले. हे उपक्रम स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान विकासाला बळकटी देण्यासाठी आणि भारतीय सशस्त्र दलांची परिचालन क्षमता वाढवण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. भारतीय नौदलाच्या एडीआयटीआय 3 आव्हानामध्ये उच्च-शक्तीच्या मायक्रोवेव्ह शस्त्र प्रणालीसाठी नाविन्यपूर्ण रचना करण्याची गरज आहे. डीआयएससी 13 मध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता, लष्करी दळणवळण आणि स्वायत्त रोबोटिक्स यासारख्या क्षेत्रांचा समावेश असलेली सात आव्हाने सादर केली आहेत.

यावेळी आपल्या भाषणात संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की स्वावलंबन प्रदर्शनाच्या पहिल्या दोन आवृत्त्यांमध्ये भारतीय नौदलाने मांडलेल्या स्प्रिंट आव्हानांतर्गत भारतीय उद्योगांकडून 2 हजारांपेक्षा जास्त प्रस्ताव आले. त्यातील 155 प्रस्तावांची लक्ष्यित आव्हानांसाठी निवड करण्यात आली. त्यामुळे 171 करार करता आले. तसेच, स्वावलंबन उपक्रम आयडीईएक्स अंतर्गत 213 सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सशी  जोडला गेला आहे. परिणामी 2 हजार कोटी रुपयांच्या 19 प्रकल्पांसाठी ॲक्सेप्टन्स ऑफ नेसेसीटी तयार करण्यात आली असून 784 कोटी रुपयांचे करार याआधीच पूर्ण झाले आहेत.


नवकल्पनांसाठी सरकारचा भक्कम पाठिंबा अधोरेखित करत, सशस्त्र दलांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करू शकतील अशी उत्पादने विकसित करण्यासाठी त्यांनी नवप्रवर्तकांना आणि स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन दिले. डिजिटल व्यवहारांचे यश आणि जनधन-आधार-मोबाईल (जेएएम) ट्रिनिटीवर प्रकाश टाकताना, या उपक्रमांमुळे सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता कशी वाढली आहे यावर त्यांनी भर दिला.

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेत, संरक्षणमंत्र्यांनी सर्व भागधारकांना एकत्र आणून सर्वसमावेशक प्रगतीसाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या सहयोगी प्रयत्नांमुळे आयातीवरील अवलंबित्व कमी झाले आहे आणि संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांच्या संयुक्त योगदानाला चालना मिळाली आहे असे त्यांनी अधोरेखित केले.यामुळे देशभरात वैज्ञानिक, तांत्रिक आणि नाविन्यपूर्ण क्रांतीला चालना मिळाली आहे. नवोन्मेषाच्या वाढीचे श्रेय देशभरातील युवांच्या स्टार्टअप्सच्या वाढत्या संख्येला दिले. ही संख्या एक लाखांपेक्षा जास्त असून पैकी 100 तरी युनिकॉर्न्स असल्याचे त्यांनी नमूद केले. “संरक्षण उत्पादनात स्टार्टअप्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आपल्या युवावर्गाच्या लक्षात आले आहे की नवोन्मेषाद्वारे देशाला आत्मनिर्भर बनवता येऊ शकते.”

या प्रसंगी बोलताना, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी देशाचे सागरी क्षेत्रातील हितसंबंध जोपासण्याप्रती नौदलाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. त्यासाठी 2047 पर्यंत संपूर्ण आत्मनिर्भर दल बनण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संरक्षण नवोन्मेष संघटना (डीआयओ) आणि नौदल नवोन्मेष आणि स्वदेशीकरण संघटना (एनआयआयओ) यांच्यातील सहकार्यावर त्यांनी भर दिला.

टीम भारतशक्ती

 


Spread the love
Previous articleRajnath Singh Receives Rs1,620 Crore In Dividends From Key DPSUs, Reviews Performances
Next articleआण्विक सरावाचे पुतीन यांचे आदेश, युद्ध ‘सर्वात धोकादायक टप्प्यावर’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here