गाझामधील नव्या लढाईसाठी हमास दहशतवादी गट जबाबदार: अमेरिका

0
दहशतवादी गट

“द्विपक्षीय स्वीकारार्ह करार पुढे नेण्याच्या प्रयत्नांना नकार दिल्यानंतर गाझामध्ये पुन्हा सुरू झालेल्या लढाईसाठी, हमास दहशतवादी गट जबाबदार आहे,” असे अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी रविवारी सांगितले. ‘याबाबतच्या खुल्या संवादासाठी आम्ही तयार आहोत,’ असेही ते म्हणाले.

“आता सगळं काही हमासवर अवलंबून आहे. अमेरिका इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,” असे विटकॉफ यांनी फॉक्स न्यूजला सांगितले. “हमासला निशस्त्रीकरण करण्याची आणि ब्रिजींग प्रस्ताव स्विकारण्याची अनेकदा संधी होती. जानेवारीत स्थगित करण्यात आलेल्या संघर्षविराम करारानंतर गाझा पट्टीमध्ये काही आठवड्यांची शांतता होती. संघर्ष विरामाच्या विस्तारावर सहमती साधण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि इस्रायलने पुन्हा हवाई हल्ले सुरू केले आणि पट्टीच्या विविध भागात जमिनीवरील सैनिक तैनात केले,” असेही ते म्हणाले.

याबाबत पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, “नवीनतम हल्ल्यांमध्ये शेकडो लोक मारले गेले आहेत. अशा अहवालांची पडताळणी करणे कठीण आहे. तथापि, हल्ल्यांची क्रूरता गाझाच्या उरलेल्या काही भागांना नक्कीच नष्ट करेल.”

विटकॉफ यांनी मार्चच्या सुरुवातीला सादर केलेल्या “bridge” योजनेचा उद्देश, रमजान आणि पासओव्हरच्या सुट्ट्यांच्या पलीकडे एप्रिलपर्यंत युद्धविराम वाढवणे हा होता, जेणेकरून शत्रुत्व कायमचे थांबवण्यासाठी वाटाघाटींसाठी वेळ मिळू शकेल.

“हमासकडून मागण्यास आपण तयार आहोत का? तर नक्कीच, आम्ही तयार आहोत, युक्रेनमधील रशियन संघर्षासारखेच. आम्हाला हत्याकांड थांबवायचे आहे, परंतु येथे आक्रमक कोण करत आहे हे आपल्याला स्पष्ट करणे आवश्यक आहे आणि ते हमास आहे,” तो म्हणाला. इस्रायलने 7 ऑक्टोबर 2023 रोजी, गाझा पट्टीभोवती इस्रायली समुदायांवर हल्ला केल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये आपली मोहीम सुरू केली, ज्यामध्ये इस्रायली लोकांच्या आकडेवारीनुसार सुमारे 1,200 लोक मारले गेले आणि 251 जणांचे अपहरण करुन त्यांना ओलीस ठेवण्यात आले.

‘युद्धाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत, किमान 50,021 पॅलेस्टिनी लोक मरण पावले आहेत तर 1,12,274 जण जखमी झाले आहेत,’ असे पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले.

सध्या जे महत्त्वाचे आहे ते म्हणजे शांततेला पुन्हा संधी देणे आणि कैदी देवाणघेवाण कार्यक्रम पुन्हा सुरू करणे. आशा आहे की, येत्या काही दिवसांत दोन्ही बाजूंनी एक करार होईल, ज्याद्वारे समस्या सोडवण्यासाठी आणि शांतता लागू करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले जाईल.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articlePakistan Witnesses Jehadi Bloodletting
Next articleBiosecurity in India: The Way Forward

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here