Wednesday, March 4, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi केंद्रीय अर्थसंकल्प आणि भारताची बौद्ध वारशाची मुत्सद्देगिरी

केंद्रीय अर्थसंकल्प आणि भारताची बौद्ध वारशाची मुत्सद्देगिरी

0

भारताचे 2825-26 आणि 2026-27 या दोन वर्षांचे केंद्रीय अर्थसंकल्प जर बारकाईने अभ्यासले तर एक गोष्ट लक्षात येते की नवी दिल्ली आपली धोरणात्मक पोहोच वाढवण्यासाठी कशाप्रकारे सांस्कृतिक वारशासंदर्भात सातत्याने समन्वय साधत आहे.

या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांमध्ये मंदिरे आणि मठांचे जतन, तीर्थक्षेत्रांवरील सुविधा केंद्रे, कनेक्टिव्हिटी आणि यात्रेकरूंसाठीच्या सुविधांसाठी बौद्ध सर्किट योजनेच्या शुभारंभाची घोषणा केली.

गेल्या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ‘स्वदेश दर्शन 2.0’ योजनेअंतर्गत बिहारमधील बौद्ध सर्किटच्या विकासासाठी 165.44 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती, ज्यामध्ये बोधगया येथे कन्व्हेन्शन सेंटर्सच्या बांधकामाचा समावेश होता.

हे दोन्ही अर्थसंकल्प पर्यटन-आधारित विकासावर महत्त्वपूर्ण भर देणारे आणि वारसा संवर्धनाला प्रादेशिक विकास तसेच बाह्य संबंधांशी जोडण्याच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहेत. ही संस्कृतीची संपत्ती आणि सौम्य शक्तीचे आधुनिक साधन म्हणून बौद्ध धर्माच्या धोरणात्मक मान्यतेचे संकेत देते.

हा उद्देश गेल्या आठवड्यात नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या (IBC) दुसऱ्या जागतिक बौद्ध शिखर परिषद 2026 (GBS) मध्ये सर्वात स्पष्टपणे व्यक्त झाला. ही परिषद केवळ एक सांस्कृतिक मेळावा म्हणून नव्हे, तर भारताच्या व्यापक राजनैतिक चौकटीत भारत बौद्ध धर्माकडे कसे पाहतो, याचा एक संकेत म्हणून कार्य करत होती.

जगभरातील विविध देशांतील भिख्खू विद्वान, प्रतिनिधी आणि शिष्टमंडळांना एकत्र आणून, या शिखर परिषदेने बौद्ध धर्माचे सभ्यतागत केंद्रस्थान म्हणून भारताच्या भूमिकेला बळकटी दिली.

करुणा, संवाद आणि सामायिक वारसा यावर जोर देऊन, भारताने बौद्ध धर्माच्या राजकारणीकरण टाळले. यामुळे विश्वासार्हता आणि स्वीकारार्हता वाढते, तसेच भारताला स्पर्धक म्हणून नव्हे, तर संयोजक आणि संरक्षक म्हणून स्थान मिळते. हा दृष्टिकोन संघर्ष करण्याऐवजी संस्कृतीच्या माध्यमातून, शांतपणे सॉफ्ट पॉवरला कार्य करण्याची संधी देतो.

बौद्ध स्थळांपर्यंत सहजपणे होणाऱ्या सुधारित प्रवेशामुळे आग्नेय आशिया, पूर्व आशिया आणि व्यापक इंडो-पॅसिफिक क्षेत्राशी लोकांचे संबंध अधिक दृढ होतात – ही अशी क्षेत्रे आहेत जिथे बौद्ध धर्म आजही सांस्कृतिक ओळख आणि राजकीय जाणीव घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. भारतात आधीच देशभरातील स्थळांना भेट देणाऱ्या बौद्ध यात्रेकरू आणि भक्तांची वाढती संख्या दिसून येत आहे.

दोन अर्थसंकल्प आणि जीबीएस 2026 यांचा एकत्रित विचार केल्यास, भारत केवळ पायाभूत सुविधांमध्येच नव्हे, तर प्रभावामध्येही गुंतवणूक करत आहे. बौद्ध परिपथ विकसित करून, नवी दिल्ली असा दृष्टिकोन अवलंबत आहे जो विकास प्रकल्प, सांस्कृतिक सेतू आणि सॉफ्ट पॉवरचे साधन अशा दोन्ही प्रकारे काम करत आहे.

अनुकृती

+ posts
Previous articleसिंगापूर एअर शो 2026: IAF कडून सारंग हेलिकॉप्टर टीम सहभागी होणार
Next articleअमेरिकेने केले भारतीय वस्तूंवरील टॅरिफ कमी, मात्र महत्त्वाचे मुद्दे अजूनही संदिग्ध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here