तटरक्षक दलाने तंत्रज्ञान केंद्रीत व्हावे : संरक्षणमंत्र्यांचे आवाहन

0
तटरक्षक
भारतीय तटरक्षक दल (ICG) कमांडर्स परिषदेला संबोधित करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

भारतीय तटरक्षक दल (ICG) कमांडर्स परिषदेच्या 41 व्या आवृत्तीचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे 24 सप्टेंबर रोजी झाले. यावेळी बोलताना संरक्षणमंत्र्यांनी भारतीय तटरक्षक दलाला पारंपरिक आणि भविष्यातील धोक्यांना तोंड देण्यास सक्षम अशा तंत्रज्ञान-केंद्रित दलात रूपांतरित करण्याचे आवाहन केले. सागरी सीमांवरील अति-आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करताना सिंह म्हणाले की असे तंत्रज्ञान देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी बल गुणक म्हणून काम करते.

जग एका तांत्रिक क्रांतीतून जात आहे, असे मत संरक्षणमंत्री सिंह यांनी व्यक्त केले. “कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान आणि ड्रोनच्या या युगात सुरक्षा क्षेत्रात लक्षणीय बदल होत आहेत. सध्याची भू-राजकीय परिस्थिती पाहता, भविष्यात सागरी धोके वाढतील. आपण सतर्क आणि सज्ज असणे आवश्यक आहे. तटरक्षक दलात मनुष्यबळ नेहमीच महत्त्वाचे असेल, परंतु तंत्रज्ञान-केंद्रित तटरक्षक दल म्हणून जगाने आपल्याला ओळखले पाहिजे.”

सिंह यांनी नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या फायद्यांवर भर दिला असला तरी त्यांनी कमांडरना तंत्रज्ञानाच्या धोक्यांपासून सावध राहण्याचे आवाहनही केले. त्यांनी तंत्रज्ञानाला दुधारी तलवार म्हटले आणि आयसीजीला सक्रिय, सतर्क आणि संभाव्य आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले.

संरक्षणमंत्र्यांनी स्वदेशी प्लॅटफॉर्म आणि उपकरणांसह सशस्त्र सेना आणि आयसीजी  यांचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगत ते म्हणाले की, भारतीय शिपयार्ड आयसीजीसाठी 4 हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या 31जहाजांची उभारणी करत आहे. आयसीजीची क्षमता वाढवण्यासाठी संरक्षण संपादन परिषदेने दिलेल्या मंजुरींचाही त्यांनी उल्लेख केला, ज्यात बहु-मिशन सागरी विमाने, सॉफ्टवेअर-परिभाषित रेडिओ, इंटरसेप्टर बोट्स, डॉर्नियर विमाने आणि पुढच्या पिढीच्या जलद गस्ती जहाजांच्या खरेदीचा समावेश आहे.

संरक्षण मंत्रालयाने म्हटल्याप्रमाणे विकसित होत असलेल्या भू-राजकीय परिदृश्य आणि सागरी सुरक्षेच्या गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक, कार्यात्मक आणि प्रशासकीय बाबींवर अर्थपूर्ण चर्चा करण्यासाठी आयसीजी कमांडर्ससाठी ही तीन दिवसीय बैठक हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या संपूर्ण परिषदेत आयसीजीचे कमांडर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि नौदल कर्मचाऱ्यांशीही चर्चा करतील. सागरी सुरक्षेशी संबंधित संपूर्ण क्षेत्रातील सेवांमधील सहकार्य वाढवणे, आयसीजीची वाढ आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला पाठबळ देणे हा या चर्चेचा उद्देश आहे.

टीम भारतशक्ती

 


Spread the love
Previous articleDefence Minister Calls For Tech-Driven Coast Guard
Next articleWhy West Africa Is Now The World’s Terrorism Hotspot

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here