भारतीय राजनयिकांची बांगलादेशी जमात प्रमुख रहमान यांच्याशी भेट?

0

“मी आजारी असताना एका भारतीय राजनयिकांनी माझी भेट घेतली होती. माझ्या शस्त्रक्रियेनंतरच्या काळात, ते येथे माझ्या घरी मला भेटले होते. परंतु, त्यांनी आम्हाला विनंती केली होती की, या भेटीबद्दल जाहीरपणे बोलू नये. पण का? मला भेटायला इतर अनेक राजनैतिक अधिकारी आले होते आणि त्याबाबत जाहीरपणे सांगण्यातही आले होते. मग अडचण काय आहे? त्यामुळे आपण सर्वांना आणि एकमेकांना जे आहे ते जाहीरपणे सांगायला हवे…”

असे विधान, बांगलादेशमधील जमात-ए-इस्लामीचे प्रमुख शफीकुर रहमान, यांनी ढाका येथे ‘रॉयटर्स’ला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

या भेटीबाबत किंवा ते भारतीय राजनैतिक अधिकारी कोण होते याबाबत, भारताकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र, इंग्रजी भाषेतील ‘प्रथम आलो’ या बांगलादेशी ऑनलाइन दैनिकाच्या मते, ही भेट गेल्या वर्षाच्या सुरुवातीला झाली होती. ऑगस्टमध्ये हसीना शेख यांच्या हकालपट्टीपूर्वी ही भेट झाली की त्यानंतर, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

‘प्रथम आलो’ने म्हटले आहे की, “भारत सरकारच्या एका स्रोताने विविध पक्षांशी संपर्क साधल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे,” ज्यावरून असे सूचित होते की, शेख हसीना सत्तेत असताना ज्या राजकीय पक्षांना आणि लोकांना टाळणे भारताने पसंत केले असते, आता भारत त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे.

यासोबतच त्यांनी असेही नमूद केले आहे की, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी ढाका येथे भेट देऊन बीएनपी (BNP) चे प्रमुख आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. झिया यांचे मंगळवारी निधन झाले होते.

रहमान यांनी, शेख हसीना यांना बांगलादेशकडे सोपवण्याबाबत भारताने घेतलेल्या भूमिकेवरही चिंता व्यक्त केली आहे.

“ही नक्कीच चिंतेची बाब आहे, कारण भारत आमचा मित्र आहे आणि जर एखादी व्यक्ती आरोपी किंवा पीडित असेल तर, नागरिकांची परस्पर देवाणघेवाण करणे हे आपले कर्तव्य आहे, परंतु भारत तसे करत नाहीये. हसीना यांना न्यायालयाने आधीच दोषी ठरवले आहे,” असे रहमान म्हणाले.

हसीना यांच्या ‘आवामी लीग’ पक्षाला निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात आले आहे, ही परिस्थिती तारिक रहमान यांच्या BNP पक्षासाठी फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा आहे. आपल्या आई खालिदा झिया यांच्या निधनानंतर तारिक रहमान यांनी पक्षाची धुरा सांभाळली आहे.

पूर्वी बीएनपी आणि जमात यांनी सरकारमध्ये आणि सरकारबाहेर एकत्र काम केले होते, परंतु सध्याच्या परिस्थितीत फेब्रुवारीमधील निवडणुकीनंतर बीएनपी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येण्याची अपेक्षा आहे. तर, जमात दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे.

रहमान यांनी हे स्पष्ट केले आहे की, त्यांचा पक्ष पुन्हा BNP सोबत एकत्र येण्यास तयार आहे, परंतु यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत, जसे की भ्रष्टाचाऱ्यांना माफी नाही, सर्वांसाठी सामाजिक न्याय, सरकारच्या कामकाजात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसावा आणि नवीन सरकारने सुधारणांना गती देणे आवश्यक आहे.

BNP ने अद्याप यावर काहीच प्रतिसाद दिलेला नाही, परंतु 17 वर्षांच्या वनवासानंतर गेल्या आठवड्यात परतलेल्या तारिक रहमान यांनी, हसीना यांना सत्तेतून बाहेर काढणाऱ्या आंदोलनाची तुलना 1971 च्या मुक्ती युद्धाशी केली, ज्यामध्ये लाखो शहीदांचे रक्त सांडले होते.

“बौद्ध, ख्रिश्चन आणि हिंदू सर्वच या देशात राहतात” असे म्हणत, अमीर यांनी ‘सुरक्षित बांगलादेश’ची मागणी केली आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज

+ posts
Previous articleAsim Munir: The Boss Of All Things Military & Nuclear In Pakistan
Next articleOperation Sindoor Commander Air Marshal Nagesh Kapoor Takes Over as Vice Chief of Air Staff

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here