संरक्षणमंत्र्यांनी हवाई दल कमांडर्स परिषदेला केले संबोधित

0
केले
हवाई दल कमांडर्स परिषद

देशाच्या आवश्यक गरजांशी जुळवून घेत, भारतीय हवाई दलाची क्षमता आणि ती अजून कशी वाढवता येईल यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग शोधण्याचे आवाहन संरक्षणमंत्री सिंह यांनी मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) नेतृत्वाला केले.
परिषदेला संबोधित करताना, राजनाथ सिंह यांनी देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी दलाच्या समर्पण आणि व्यावसायिकतेचे कौतुक केले. नव्याने उद्भवत असलेल्या आव्हानांशी जुळवून घेण्याच्या हवाई दलाच्या  क्षमतेवर त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि आपली राष्ट्रीय उद्दिष्टे आणि आकांक्षा लक्षात घेऊन क्षमता वाढवण्याच्या प्रक्रियेला अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनविण्याचे मार्ग शोधण्याचे कमांडर्स आणि संरक्षण दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवाहन केले.
परिषदेदरम्यान संरक्षणमंत्र्यांना भारतीय हवाई दलाच्या परिचालन क्षमतेची माहिती देण्यात आली. 30 सप्टेंबर रोजी भारतीय हवाई दलाचा कार्यभार स्वीकारणारे एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच परिषद होती.
या परिषदेला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग (ज्यांनी 1 नोव्हेंबर रोजी कार्यभार स्वीकारला) आणि डीआरडीओ अध्यक्ष  डॉ. समीर व्ही. कामत आणि भारतीय हवाई दलाचे वरिष्ठ कमांडर उपस्थित होते.
ही परिषद भारतीय हवाई दलाच्या वरिष्ठ नेतृत्वाला सध्याच्या आव्हानांवर विचारविनिमय करण्यासाठी आणि परिचालन उत्कृष्टता सुनिश्चित करण्यासाठी आणि संरक्षण क्षमतांमधील आत्मनिर्भरता बळकट करण्यासाठी तसेच भविष्यातील कृतींचे धोरण आखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून काम करेल,” असे संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
स्वदेशी लष्करी यंत्रसामग्रीच्या अधिग्रहणावर भर देत, भारतीय हवाई दल आपल्या आधुनिकीकरण प्रयत्नांना गती देत असताना ही उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे. त्याच वेळी, सशस्त्र सेना कॅथेटेरायझेशन प्रक्रियेस पुढे नेत भविष्यातील युद्धासाठी संसाधने अनुकूल करण्याच्या उद्देशाने एक मोठी सुधारणा घडवून आणत आहे.
सध्या सुरू असलेल्या परिषदेने महत्त्वपूर्ण परिचालन, प्रशासकीय आणि धोरणात्मक मुद्द्यांवर सखोल चर्चा सुलभ केली आहे. आंतर-सेवा समन्वय बळकट करण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या नेतृत्वाने सीडीएस आणि लष्कर तसेच नौदलाच्या प्रमुखांशीही संवाद साधला.
ही परिषद आयएएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी सध्याच्या आव्हानांवर विचारमंथन करण्यासाठी आणि संरक्षण क्षमतांमध्ये परिचालन उत्कृष्टता आणि आत्मनिर्भरता राखण्यासाठी भविष्यातील कृतींची रणनीती तयार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरली.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleRussian President Putin Approves New Nuclear Doctrine, Warns West
Next articleफॉर्च्युन मॅगझिन : 39 टक्के कंपन्यांची चीनऐवजी भारताला पसंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here