कोलंबो सुरक्षा परिषदेचे होणार पुनरुज्जीवन

0
NSA Doval
कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह (सीएससी) सचिवालय स्थापन करण्यासाठी सनद आणि सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मालदीव, मॉरिशस आणि श्रीलंकेच्या प्रतिनिधींसोबत शुक्रवारी संवाद साधला

कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह (सीएससी) किंवा कोलंबो सुरक्षा परिषद सचिवालयाच्या स्थापनेसाठी आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या झाल्याने चार वर्षे जुना प्रादेशिक सुरक्षा गट असलेल्या कोलंबो सुरक्षा परिषदेचे पुनरुज्जीवन होणार आहे.

श्रीलंका सरकारने शुक्रवारी कोलंबो येथे या स्वाक्षरी समारंभाचे आयोजन केले होते. परिषदेतील सदस्य देशांना भेडसावणारे आंतरराष्ट्रीय धोके आणि समान चिंता यांच्याशी संबंधित आव्हाने दूर करून प्रादेशिक सुरक्षेला चालना देणे हा सीएससीचा मुख्य उद्देश आहे.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह मालदीवचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) इब्राहिम लतीफ, डीसी (निवृत्त), श्रीलंकेतील मॉरिशस प्रजासत्ताकाचे उच्चायुक्त हेमांडोयल दिल्लम आणि श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सागला रत्नायके यांनी सीएससीशी संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या.

यावेळी बोलताना डोवाल यांनी पारंपरिक, अपारंपरिक आणि उदयोन्मुख संकरीत सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी कोलंबो सुरक्षा परिषदेच्या महत्त्वावर भर दिला. विविध सुरक्षा स्तंभांमध्ये शाश्वत प्रादेशिक सहकार्याची असणारी गरज त्यांनी अधोरेखित केली.

सीएससीशी संबंधित प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात सहकार्याचे पाच मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत.

यामध्ये सागरी बचाव आणि सुरक्षा; दहशतवाद आणि कट्टरतावाद यांचा सामना करणे; तस्करी आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्ह्यांचा सामना करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, सायबर सुरक्षा आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा तसेच तंत्रज्ञान संरक्षण आणि मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण हे सहकार्याची कार्यक्षेत्रे आहेत.

परिषदेच्या भविष्यातील उपक्रमांबाबत प्रतिनिधीमंडळाच्या प्रमुखांमध्ये झालेल्या चर्चेने या कार्यक्रमाची सांगता झाली. श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तालयाने या कार्यक्रमाबाबत केलेल्या ट्विटमध्ये नमूद केले की, ‘प्रादेशिक सुरक्षा सहकार्य वाढवण्यासाठी हा एक महत्त्वाचा मंच असून, ही स्वाक्षरी सीएससी रोडमॅपमधील एक मैलाचा दगड आहे.’

डोवाल यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, पंतप्रधान दिनेश गुणवर्धने आणि श्रीलंकेचे सागला रत्नायके आणि मालदीवचे इब्राहिम लतीफ यांच्यासह इतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचीही भेट घेतली.

29 ऑगस्ट रोजी कोलंबो येथे पंतप्रधान गुणवर्धने यांच्याशी झालेल्या बैठकीत डोवाल म्हणाले की, भारताला श्रीलंकेसोबतचे सहकार्य आणखी वाढवायचे आहे. मोठ्या आणि छोट्या पर्यायी ऊर्जा प्रकल्पांना पाठिंबा दिल्याबद्दल गुणवर्धने यांनी भारताचे आभार मानले, असे पंतप्रधानांच्या माध्यम विभागाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. याशिवाय, सशस्त्र दल आणि नागरी सेवकांना त्यांचे कौशल्य आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण दिल्याबद्दलही त्यांनी भारताचे आभार मानले.

श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तीन आठवडे आधी डोवाल यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांचीही भेट घेतली.

डोवाल यांनी श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते तसेच समागी जन बालावेगयाचे नेते साजिथ प्रेमदासा, संसद सदस्य आणि नॅशनल पीपल्स पॉवरचे नेते अनुरा कुमार दिसानायके यांच्याशी संवाद साधला. याशिवाय त्यांनी विविध राजकीय पक्ष आणि प्रदेशातील राजकीय नेते आणि प्रतिनिधींचीही भेट घेतली.

डोवाल यांच्या भेटीसंदर्भात सागला रत्नायके यांनी एका मुलाखतीत सांगितले की, परिषदेपूर्वी राष्ट्रीय सुरक्षेवर सखोल चर्चा करण्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे आपल्या निवासस्थानी स्वागत करणे हा एक विशेषाधिकार आहे.

ते म्हणाले, “त्यांच्या भेटीबद्दल, प्रादेशिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी आमची समान वचनबद्धता याबद्दल मी आभारी आहे.”

डोवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात उच्चायुक्त संतोष झा, अतिरिक्त सचिव पुनीत अग्रवाल, अक्षय जोशी, गौरव अलुवालिया आणि तेजा चंदन यांचा समावेश होता.
तर श्रीलंकेकडून पंतप्रधानांचे सचिव अनुरा दिसानायके, अतिरिक्त सचिव हर्षा विजेवर्धने आणि सल्लागार सुगीश्वर सेनाधीरा यांचा सहभाग होता.

यावर्षी जुलैमध्ये मॉरिशसने आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बैठकीत कोलंबो सुरक्षा परिषदेने बांगलादेशचे पाचवा सदस्य देश म्हणून अधिकृतपणे स्वागत केले.

या परिषदेचे भारत, श्रीलंका, मॉरिशस आणि मालदीव हे आतापर्यंतचे सदस्य होते. त्यात आता बांगलादेश सहभागी झाला आहे.

तर सेशल्सने निरीक्षक राज्य म्हणून भाग घेतला होता.

सीएससीची स्थापना 2020 मध्ये झाली. त्यावेळी भारत, श्रीलंका आणि मालदीव यांनी सागरी सहकार्याबाबतच्या त्यांच्या त्रिपक्षीय बैठकीची व्याप्ती वाढविण्यास सहमती दर्शवली होती.

विशेष बाब म्हणजे, मार्च 2022 मध्ये माले येथे झालेल्या समूहाच्या पाचव्या बैठकीत मॉरिशस या परिषदेत सहभागी झाला.

गेल्या महिन्यात, सदस्य देशांनी सीएससीच्या 2023-24 मधील रोडमॅपमध्ये नमूद केलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

जुलै 2023 मध्ये मालदीवने आयोजित केलेल्या आणि गेल्या डिसेंबरमध्ये मॉरिशसने आयोजित केलेल्या आधीच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बैठकांमधील निर्णयांवर त्यांनी चर्चा केली.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गेल्या डिसेंबरमध्ये मॉरिशसमध्ये कोलंबो सुरक्षा परिषदेच्या (सीएससी) सहाव्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले.

मॉरिशस आणि श्रीलंकेव्यतिरिक्त सेशेल्स आणि बांगलादेशच्या प्रतिनिधींनी या बैठकीत भाग घेतला होता.

तृप्ती नाथ
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleINS Tabar Conducts Maritime Partnership Exercise With Spanish Navy
Next articlePacific Leaders Remove Taiwan From Communique After China Complaint

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here