Saturday, February 21, 2026
Solar
MQ-9B
Home Bharat Shakti Marathi भारताच्या दहशतवादाविरुद्ध शू्न्य सहनशीलतेच्या भूमिकेला, जपानचा पाठिंबा

भारताच्या दहशतवादाविरुद्ध शू्न्य सहनशीलतेच्या भूमिकेला, जपानचा पाठिंबा

0

22 एप्रिल रोजी झालेल्या पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने आपल्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशिलतेच्या धोरणाची पुन्हा एकदा पुष्टी केली असून, यासंबंधी 33 विविध देशांमध्ये राजकीय एक व्यापक आंतरराष्ट्रीय मोहिम सुरू केली आहे.

भारतीय शिष्टमंडळ जपानमध्ये

भारताच्या प्रमुख धोरणात्मक भागीदारांपैकी एक आणि क्वाड सदस्य असलेल्या जपान दौऱ्यासाठी, भारतीय शिष्टमंडळ टोकियो येथे रवाना झाले. यावेळी भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला जपानने ठाम पाठिंबा दर्शवला.

जेडीयूचे खासदार संजय कुमार झा, यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय भारतीय संसदीय शिष्टमंडळाने जपानचे परराष्ट्रमंत्री ताकेशी इवाया यांची भेट घेतली. त्यांनी पाहलगाम हल्ल्यावर शोक व्यक्त करत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला. “दहशतवाद कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही,” असे इवाया म्हणाले. “भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायासोबत जपान ठामपणे उभा आहे.”

दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलता

झा यांनी भारताची ठाम भूमिका अधोरेखित करत सांगितले की, ‘भारत दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे यांच्यात कोणताही फरक करत नाही.’ यावेळी झा यांनी, ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत राबवण्यात आलेल्या भारताच्या अचूक आणि योग्य प्रतिसादाची माहिती दिली आणि 25 एप्रिल रोजी देण्यात आलेल्या, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निवेदनानुसार, उत्तरदायित्वासाठी भारताच्या मागणीला जपानने समर्थन देण्याचे आवाहन केले.

“भारताची दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेची नीती आहे, आणि भारत खरे गुन्हेगार आणि त्यांच्या समर्थकांना जगासमोर आणण्यासाठी जागतिक भागीदारांसोबत काम करत राहील,” असे झा म्हणाले.

परराष्ट्रमंत्री इवाया, यांनी भारताच्या संयमाचे कौतुक करत, आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद्यांना जबाबदार धरण्यासाठी जपानच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला.

या शिष्टमंडळाने, जपानचे माजी पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि जपानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे अध्यक्ष ताकाशी एंडो यांच्यासह अनेक प्रमुख राजकीय नेत्यांची भेट घेतली. दोघांनीही भारताला दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात मदत करण्याबाबत जपानच्या निष्ठेची पुनःदुर्बळता व्यक्त केली. तसेच, जपानी विचारवंत संस्थांसोबतच्या चर्चांमध्येही भारताच्या भूमिकेला ठाम पाठिंबा व्यक्त करण्यात आला.

शिष्टमंडळांबाबत माहिती

हा रजकीय दौरा, 21 मे ते 5 जून या कालावधीत, 33 देशांमध्ये भेट देणाऱ्या सात भारतीय शिष्टमंडळांच्या व्यापक मोहिमेचा भाग आहे.

या देशांची निवड का केली गेली, यावर बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, “या संपर्क मोहिमेसाठी ३३ देशांची निवड झाली आहे. त्यापैकी १५ देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य आहेत – पाच कायमस्वरूपी आणि दहा तात्पुरते. लवकरच आणखी पाच सदस्य जोडले जातील. दहशतवादी आणि त्यांचे समर्थक यांना उत्तरदायित्वासाठी जागतिक सहमती घडवून आणणे हे उद्दिष्ट आहे.”

या शिष्टमंडळांमध्ये 59 खासदार, माजी मंत्री आणि विविध राजकीय पक्षांतील माजी मुत्सद्दींचा समावेश आहे. ते संयुक्त अरब अमिराती, रशिया, ग्रीस, स्पेन, अमेरिका, फ्रान्स, दक्षिण आणि कॅरिबियन देश तसेच दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांना भेट देणार आहेत.

या मोहिमेचा उद्देश, पाकिस्तानच्या सीमापार दहशतवादातील सहभागाचा पर्दाफाश करणे आणि प्रायोजित दहशतवादाविरुद्ध आंतरराष्ट्रीय समर्थन मिळवणे आहे. पाकिस्तान पुढील 17 महिन्यांसाठी, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य असून, भारतविरोधी प्रचार चालवण्याची शक्यता आहे.

“ही भारताच्या दहशतवादाविरोधातील निर्धाराला अधोरेखित करणारी भव्य राजनैतिक मोहिम आहे,” असे जैस्वाल म्हणाले. “दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरोधात जगाने एकजुटीने आवाज उठवावा, हीच आमची इच्छा आहे.”

भारताची सक्रिय भूमिका आणि त्याच्या विविधपक्षीय संसदीय नेतृत्वाद्वारे, दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचा स्पष्ट संदेश दिला गेला आहे — आणि या दहशतवादाचे आंतरराष्ट्रीय पाठीराखे राजनैतिक, कायदेशीर आणि मुत्सद्दी मार्गाने सामोरे जातील.

टीम स्ट्रॅटन्यूज

+ posts
Previous articleAndaman Nicobar Command: India’s Strategic Outpost—C-in-C, Air Marshal Saju Balakrishnan Exclusive
Next articleAustralia floods: पुरामध्ये 4 जणांचा मृत्यू, शोधकार्य सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here