Operation Sindoor: दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकचे सैनिक उपस्थित

0

‘Operation Sindoor’ अंतर्गत भारताच्या अचूक हल्ल्यात मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी लष्कराचे सैनिक सहभागी होताना दिसले. दहशतवादी गटांशी पाकिस्तान लष्कराची असलेली भागीदारी या कृतीने अधोरेखित झाली.

लाहोरपासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या मुरीदके येथे झालेल्या अंत्यसंस्कारात जागतिक स्तरावर कुप्रसिद्ध असलेल्या दहशतवादी हाफिज सईदने स्थापन केलेल्या प्रतिबंधित गट जमात-उद-दावाचे (JuD) वरिष्ठ सदस्य देखील उपस्थित होते.

भारतीय सैन्याने मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबा (LeT) च्या बालेकिल्ल्याला लक्ष्य केले तेव्हा मारले गेलेले दहशतवाद्यांमध्ये कारी अब्दुल मलिक, खालिद आणि मुदस्सीर यांचा समावेश होता. मुरीदके हे सीमापार कारवाई दरम्यान निष्क्रिय केलेल्या नऊ दहशतवादी केंद्रांपैकी एक होते.

माध्यमांच्या वृत्तांनुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे अंत्यसंस्कार कडक सुरक्षेत पार पडले, ज्याला लष्करी आणि नागरी अधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. यामुळे दहशतवादी घटकांना सक्षम आणि कायदेशीर करण्यात पाकिस्तानची भूमिका आणखी दृढ झाली.

लष्कर-ए-तोयबाचा हाफिज अब्दुल रौफ याने अंत्यसंस्काराचे नेतृत्व केले. ज्ञात दहशतवाद्यांच्या सार्वजनिक अंत्यसंस्कारात पाकिस्तानच्या लष्करी आणि नोकरशाही यंत्रणेचा दृश्यमान आणि अधिकृत सहभाग यावर तीव्र टीका झाली आहे, ज्यामुळे अतिरेकी गटांना देशाकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल भारताला वाटणाऱ्या प्रदीर्घ चिंतेला दुजोरा मिळाला आहे.

ऑपरेशन सिंदूर

7 मे रोजी पहाटे सुरू करण्यात आलेले Opertion Sindoor हे 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेला प्रतिसाद होता. या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये बहुतेक हिंदू पर्यटक होते.

Operation Sindoor अंतर्गत करण्यात आलेली कारवाई केवळ 25 मिनिटे चालली आणि त्यात जैश-ए-मोहम्मद (जेईएम), लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या गटांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके)  उभारलेल्या दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले.

मुरीदके येथील मरकझ तैयबा (एलईटी मुख्यालय), बहावलपूरमधील मरकझ सुभान अल्लाह (जेईएम तळ), सियालकोटमधील मेहमूना जोया सुविधा (हिजबुल मुजाहिदीन), बर्नाला येथील मरकझ अहले हदीस (एलईटी सुविधा) आणि मुझफ्फराबादमधील शवाई नाल्ला (एलईटी प्रशिक्षण शिबिर) यासह प्रमुख दहशतवादी केंद्रांवर हल्ला करण्यात आल्याच्या वृत्ताला लष्करी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

पहाटे 1.05 ते 1.30 दरम्यान राबवण्यात आलेले हे ऑपरेशन हवाई आणि भूदल यांच्या समन्वित युनिट्सद्वारे पार पाडण्यात आले.

भारताचे मीडिया ब्रीफिंग

संयुक्त पत्रकार परिषदेत, भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉर्प्सच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीची सविस्तर माहिती दिली.

या ब्रीफिंगमध्ये सहभागी झालेले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, पाकिस्तानने त्यांच्या हद्दीतून कार्यरत असलेल्या दहशतवादी घटकांविरुद्ध सतत निष्क्रियता दाखवल्यामुळे हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मिस्री यांनी भर दिला की भारताची कारवाई संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या चौकटीनुसार आहे, ज्यामध्ये दहशतवादी हल्ल्यांना जबाबदार धरण्याचे, आर्थिक आणि इतर मदत करणाऱ्यांना जबाबदार धरण्याचे आवाहन केले आहे.

सीमेपलीकडून दहशतवादी पायाभूत सुविधांमुळे निर्माण झालेल्या स्पष्ट आणि सध्याच्या धोक्यामुळे त्यांनी हा हल्ला अतिशय “प्रमाणबद्ध” आणि “आवश्यक” असल्याचे वर्णन केले.

मोहीम संपल्यानंतर काही वेळातच, भारताच्या संरक्षण मंत्रालयाने ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्याची पुष्टी करणारे अधिकृत निवेदन जारी केले.

मंत्रालयाने भर दिला की ही कारवाई “केंद्रित, मोजून मापून आणि  नियंत्रित” होती, ज्यामध्ये कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आलेले नाही हे स्पष्ट केले.

नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी भारताच्या प्रयत्नांवर अधिक प्रकाश टाकण्यात आला. लक्ष्य आणि हल्ल्यांची वेळ या दोन्ही गोष्टींची निवड करताना खूप काळजी घेण्यात आली होती याकडेही पत्रकारांचे लक्ष वेधण्यात आले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleFrench Firepower Fuels India’s Precision Strikes in Operation Sindoor
Next articleOperation Sindoor: भारताच्या अचूक हल्ल्यांना फ्रान्सचा हातभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here