पाकिस्तानी हॅकर्सनी भारताविरुद्धच्या सायबर युद्धात गाठली खालची पातळी

0
युद्धात

पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव वाढत असताना, पाकिस्तानने भारताविरुद्ध kinetic and cyber provocations अशा दोन्ही प्रकारच्या कारवाया तीव्र केल्या असल्याची माहिती संरक्षण आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर (LoC) सलग सातव्या रात्री शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केले. याशिवाय 1 आणि 2 मेच्या मध्यरात्री अकारण गोळीबार झाल्याची नोंद झाली. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी गोळीबार झाला असून नंतर जम्मू भागातील पूंछ आणि अखनूर सेक्टरपर्यंत यांची व्याप्ती वाढली.

दरम्यान, भारतीय सायबर एजन्सींनी ‘सायबर ग्रुप एचओएएक्स1337’ आणि ‘नॅशनल सायबर क्रू’ यासह पाकिस्तान समर्थित हॅकर गटांच्या हॅकिंगच्या समन्वित प्रयत्नांची मालिका हाणून पाडली आहे, असे सरकारी सूत्रांनी भारतशक्तीला सांगितले.

आर्मी पब्लिक स्कूल, नगरोटा आणि सुंजुवान यांच्या वेबसाइट टार्गेट करण्यात आलेल्या लक्ष्यांमध्ये होत्या. हॅकर्सनी पहलगाम हल्ल्यातील पीडितांची खिल्ली उडवणाऱ्या संदेशांचा वापर करून त्यांना विकृत करण्याचा प्रयत्न केला. military veteransना आरोग्य सेवा देणारी आणखी एक वेबसाइटवर देखील विकृत पोस्ट्स टाकण्यात आल्या होत्या. या सगळ्या गोष्टी असुरक्षित असणाऱ्या नागरी प्लॅटफॉर्मना जाणूनबुजून लक्ष्य केल्याचे सूचित करते.

या घडामोडींशी परिचित असलेल्या एका सायबर सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, “मुले, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित वेबसाइट्सचे वारंवार उल्लंघन करण्याचे  प्रयत्न केले गेले आहेत. हे एक नवीन नीचांकी प्रतिक असून अनैतिक पद्धतीने डिजिटल युद्धाच्या माध्यमातून भारताला चिथावणी देण्याच्या पाकिस्तानच्या वाढत्या नैराश्याचे संकेत देणारे आहे.

इतर टार्गेट्समध्ये आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि भारतीय हवाई दलाच्या माजी सैनिकांशी संबंधित वेबसाइट यांचा समावेश आहे. या सायबर हल्ल्यांकडे भारतीय सुरक्षा संस्था पाकिस्तानच्या संकरीत युद्धाच्या व्यापक मोहिमेचा एक भाग म्हणून पाहात असून पाकिस्तानने सध्या भारताला अस्थिर करण्यासाठी दहशतवाद आणि माहिती मोहिमा या दोन्हींचा वापर केला आहे.

एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, “पाकिस्तान लष्करी, नागरी आणि डिजिटल अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारताच्या संयमाची चाचणी घेत असल्याचे दिसते.”

टीम भारतशक्ती  


Spread the love
Previous articleAir Marshal N Tiwari Assumes Charge as Vice Chief of Air Staff
Next articleAdvanced Light Helicopters Grounded: HAL’s Reputation At Stake

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here