Pahalgam हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधानांकडून लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य

0

मंगळवारी रात्री सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या माध्यम अहवालांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Pahalgam दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पद्धत निवडीचे, वेळेचे आणि टार्गेट निश्चीत करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य भारतीय लष्कराला दिले आहे.

पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, PM Modi नी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेतला.

प्रमुख भारतीय टेलिव्हिजन वाहिन्यांनी सूत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, “दहशतवादावर जबरदस्त प्रहार करणे हा आमचा राष्ट्रीय संकल्प आहे आणि भारतीय लष्कराच्या भूमिकेवर मला पूर्ण विश्वास आहे.”

या बैठकीनंतर लगेचच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधानांचा हा संदेश पाहलगाममधील बैसरन येथे 26 नागरिकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध, लष्करी कारवाईला हिरवा कंदील दर्शवतो. पुलवामा (फेब्रुवारी 2019) नंतरचा हा सर्वात भयानक नागरी हल्ला मानला जात आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले होते. हे तळ जैश-ए-मोहम्मद या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचे होते आणि पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने चालवले जात होते.

पहलगाम हल्ला

22 एप्रिल रोजी, पाकिस्तानातील द रेसिस्टन्स फ्रंट (TRF) या लष्कर-ए-तैयबाच्या (LeT) शॅडो गटाच्या दहशतवाद्यांनी, पर्यटकांना इस्लामी कलमा म्हणण्यास भाग पाडले आणि त्यांच्या धार्मिक ओळखीची खात्री करण्यासाठी त्यांना पँट खाली काढण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसमोरच गोळ्या घालून त्यांची निर्घृण हत्या केली.

या नरसंहारानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आणि भारत-पाकिस्तान संबंध अधिक तणावपूर्ण झाले. नवी दिल्लीने ठामपणे सूड घेण्याचे घोषित केले.

तत्काळ प्रतिसाद म्हणून, भारताने ऐतिहासिक सिंधू नदी जलवाटप करार निलंबित केला आणि अटारी-वाघा बॉर्डर बंद केली, जी दोन्ही देशांमधील व्यापार आणि लोकांमधील परस्पर संबंधांची जीवनवाहिनी मानली जाते. तसेच, भारताने पाकिस्तानचे मुत्सद्दींना भारताबाहेर हाकलले, उच्चायुक्तालयांची संख्या कमी केली आणि भारतात असलेल्या पाकिस्तानी व्हिसा धारकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश दिले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleभारताच्या Indus Water Treaty रद्द करण्याच्या निर्णयाला पाकिस्तानचे आव्हान
Next articleभारताकडून 36 तासांच्या आत लष्करी हल्ला होणार: पाकिस्तानचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here