भारताकडून 36 तासांच्या आत लष्करी हल्ला होणार: पाकिस्तानचा दावा

0

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला असून; भारत याप्रकरणी पुढील 36 तासांत लष्करी कारवाई करण्याची शक्यता असल्याचा दावा, पाकिस्तानी खासदाराने केला आहे.

22 एप्रिल रोजी, पाहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात, 26 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव अधिक तीव्र झाला आहे. दरम्यान, एका पाकिस्तानी खासदाराने असा दावा केला आहे की, “खात्रीलायक गुप्तचर माहितीनुसार, भारत पुढील 24 ते 36 तासांत पाकिस्तानवर लष्करी कारवाई करणार आहे.”

माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्ला तारार यांनी, X पोस्टद्वारे, “भारत बिनबुडाचे आणि बनावट आरोप करत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करण्याची तयारी करत आहे,” असा आरोप केला.

तारार यांनी भारताची भूमिका टोकाची असल्याचा उल्लेख करत, “नवी दिल्ली स्वतःच न्यायाधीश, न्यायालय आणि फाशी देणारा अधिकारी बनत आहे आणि पाकिस्तान त्यांची ही भूमिका नाकारतो,” असे म्हटले आहे.

तारार नेमकं काय म्हणाले?

अताउल्ला तारार म्हणाले की, “पाकिस्तानवर दहशतवादाचा आरोप करण्याऐवजी भारताने लक्षात घ्यायला हवे की, मुस्लिमबहुल असलेला पाकिस्तान स्वतः याआधी दहशतवादाचा बळी राहिला आहे आणि त्यामुळे ही वेदना त्याला पूर्णपणे समजते.”

“आम्ही दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि दहशतवादी घटनांचा कायम निषेध करत आलो आहोत,” असा दावा त्यांनी केला.

तारार पुढे म्हणाले की, “पाकिस्तानने एक जबाबदार देश म्हणून, या प्रकरणाच्या तपासासाठी विश्वासार्ह, पारदर्शक आणि तटस्थ अशा तज्ज्ञांच्या आयोगाची स्थापना करण्याची तयारी दर्शवली होती.” तरार यांनी यावेळी, आंतरराष्ट्रीय समुदायाला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेण्याचे आवाहन केले आणि कोणत्याही तणाववाढीचे पूर्ण उत्तरदायित्व भारतावरच असल्याचे सांगितले.

मोदींनी दिली लष्करी कारवाईला मुभा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, भारतीय लष्कराला पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरासाठी “संपूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य” दिल्यानंतर, तारार यांचा हा दावा समोर आला.

सरकारी सूत्रांनी सांगितले की, “पंतप्रधानांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची पद्धत, वेळ आणि लक्ष्य ठरवण्याचे पूर्ण अधिकार दिले आहेत.”

याआधीही मोदींनी स्पष्टपणे सांगितले होते की, “गुन्हेगारांना शोधून काढून शिक्षा देईपर्यंत भारत स्वस्थ बसणार नाही आणि त्यांचा पाठलाग पृथ्वीच्या शेवटच्या टोकापर्यंत केला जाईल.”

भारताची ठोस पावले

  • पहलगाम हल्ल्यानंतर भारताने अनेक ठोस राजकीय आणि प्रशासकीय उपाय अमलात आणले आहेत:
  • पाकिस्तानचे लष्करी अधिकाऱ्यांची हकालपट्टी
  • 1960 मधील सिंधू जलसंधी कराराचे निलंबन
  • 27 एप्रिलपासून सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले गेले
  • अटारी-सीमा (Attari land transit post) तातडीने बंद करण्यात आली

या सगळ्याला प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.

दरम्यान, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, लाइन ऑफ कंट्रोल (LoC) वर सलग सहाव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून, भारतीय लष्कराने पाकिस्तानकडून होणाऱ्या अकारण गोळीबाराला प्रत्युत्तर दिल्याचे वृत्त समोर आले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज


+ posts
Previous articlePahalgam हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधानांकडून लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य
Next articleईशान्य नायजेरियातील हल्ल्यांमध्ये वाढ, जिहादी परत येण्याची भीती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here