हवाई संरक्षणविषयक तयारी आणि तांत्रिक कौशल्याचे शक्तिशाली प्रदर्शन करताना, भारताने बुधवारी रात्री उशिरा आणि गुरुवारी पहाटे पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात केलेला हवाई हल्ला यशस्वीरित्या हाणून पाडला. यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली ती रशियाने बनवलेली S-400 ट्रायम्फ क्षेपणास्त्र प्रणाली, जी ‘आकाश’ या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र बॅटरी आणि एकात्मिक काउंटर-ड्रोन तंत्रज्ञानाने बळकट बनवण्यात आली आहे. समन्वित प्रतिसादामुळे उत्तर आणि पश्चिम क्षेत्रातील भारतीय लष्करी आस्थापनांना लक्ष्य करून मारा करण्यात आलेली 15 क्षेपणास्त्रे आणि डझनभर ड्रोन तसेच दारूगोळ्यांचा मोठा साठा नष्ट करण्यात आला.
अचूक प्रतिसाद
भारताच्या प्रगत हवाई संरक्षण प्रणाली, इंटिग्रेटेड काउंटर-यूएएस ग्रिड आणि इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टम (IACCS), ज्यांना एका विस्तृत रडार नेटवर्कचा सपोर्ट होता, त्यांनी येणारे धोके जलदपणे शोधून काढले. एकदा पडताळणी झाल्यानंतर, S-400 युनिट्सनी उच्च अचूकतेने अनेक हवाई लक्ष्यांवर हल्ला केला. सर्व क्षेपणास्त्रे त्यांच्या इच्छित लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट करण्यात आली, ज्यामुळे भारतीय मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले नाही, याला संरक्षण सूत्रांनी दुजोरा दिला आहे.
S-400: भारताच्या हवाई संरक्षणाचा आधारस्तंभ
रशियाच्या अल्माझ-अँटीने विकसित केलेली S-400 ट्रायम्फ ही जागतिक स्तरावर सर्वात प्रगत लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक मानली जाते. ही प्रणाली भारताच्या हवाई संरक्षण व्यवस्थेचा एक मध्यवर्ती आधारस्तंभ बनली आहे, जी 400 किलोमीटरपर्यंत आणि 30 किलोमीटर उंचीवर विमाने, UAV, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि अगदी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना देखील लक्ष्य करण्यास सक्षम आहे.
अमेरिकेच्या काउंटरिंग अमेरिकाज अॅडव्हर्सरीज थ्रू सॅन्क्शन्स ॲक्ट (CAATSA) अंतर्गत तीव्र आक्षेप आणि संभाव्य निर्बंधांचा धोका असूनही भारताने 2018 मध्ये रशियासोबत पाच S-400 रेजिमेंट खरेदी करण्यासाठी 5 अब्ज डॉलर्सचा करार केला. त्यानंतर तीन रेजिमेंट वितरित आणि तैनात करण्यात आल्या आहेत; उर्वरित दोन पुढील वर्षापर्यंत अपेक्षित आहेत.
अत्यंत गतिमान वेगाने आणि गुप्तपणे, प्रत्येक S-400 रेजिमेंट एकाच वेळी 80 लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकते, तसेच एकाच वेळी 72 क्षेपणास्त्रे सोडू शकते. ते – 50 degree C ते +70 degree C पर्यंतच्या अति तापमानात प्रभावीपणे कार्य करते आणि शत्रूच्या पाळत ठेवणाऱ्या प्रणालींसाठी ते अदृश्य राहते, ज्यामुळे बचावात्मक आणि शत्रूचा हल्ला होण्यापूर्वीच त्याच्या सैन्यबळची ताकद कमी किंवा नष्ट करण्यासाठी असणाऱ्या मोहिमांसाठी अमूल्य बनते.
सामरिक श्रेष्ठता आणि प्रत्युत्तर
अयशस्वी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने कामिकाझे ड्रोनचा वापर करून अचूक प्रत्युत्तरात्मक हल्ले केले. या हल्ल्यांमुळे लाहोरमधील चीनने पुरवलेल्या HQ-9B हवाई संरक्षण रडार प्रणालीसह अनेक पाकिस्तानी लष्करी मालमत्ता निकामी झाल्याचे वृत्त आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाने रडार प्रणाली यशस्वीपणे निष्क्रिय केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे, मात्र यामुळे पाकिस्तानच्या संरक्षणात्मक ग्रिडमधील कमकुवतपणा उघड झाला.
पाकिस्तानने रावळपिंडी, गुजरानवाला, बहावलपूर आणि कराचीजवळ ड्रोन घुसखोरीची कबुली दिली. मात्र त्यातील बहुतेक ड्रोन निष्क्रिय केल्याचा दावा केला. अर्थात लाहोरमधील एका प्रमुख रडार साइटचे नुकसान आणि किमान चार पाकिस्तानी लष्करी कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्याने या कामगिरीतील अपयशाची नोंद झाली.
धोरणात्मक परिणाम
Shaheen-3 ची मारक क्षमता 2,750 किलोमीटरपर्यंत असली तरी, S-400 च्या नेतृत्वाखालील भारताच्या प्रगत क्षेपणास्त्र अडथळे प्लॅटफॉर्ममुळे त्याची कार्यक्षमता अत्यंत मर्यादित होत आहे. या प्रणालीचा लांब पल्ल्यावरील धोक्यांचा शोध घेणे आणि अति उंचीवर नष्ट करण्याची क्षमता अशा धोरणात्मक धोक्यांसाठी एक मजबूत प्रतिकार प्रणाली म्हणून काम करते.
हुमा सिद्दीकी