वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना केले ब्रीफ

0

काश्मीरमधील पहलगाम येथे 26 नागरिकांचा बळी घेणाऱ्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारत लष्करी पर्यायांवर विचार करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्करप्रमुख यांच्यात गंभीर चर्चा सुरू आहे. रविवारी एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना भारतीय हवाई दलाची सज्जता आणि धोरणात्मक स्थितीची माहिती दिली. नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि पंतप्रधान यांच्यात शनिवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही बैठक झाली. बदलत्या सुरक्षा परिस्थितीचे गांभीर्य या बैठकींमध्ये प्रतिबिंबित झाले.

अधिकाऱ्यांनी बैठकीतील तपशीलांबद्दल मौन बाळगले असले तरी, हे संवाद त्रि-सेवा धोरणात्मक व्यापक सत्राचा भाग असल्याचे सूत्रांनी सूचित केले आहे. लष्करी सज्जता, प्रतिसाद पर्याय आणि भू तसेच सागरी सीमेवर वाढीव पाळत ठेवणे यावर चर्चा केंद्रित होती.

भारत भेटीवर आलेले अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लॉरेन्को यांच्यासमवेत शनिवारी संयुक्त भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला, ज्यामुळे या हल्ल्याला काही प्रमाणात गतिमान प्रतिसाद मिळाल्याचे सूचित होते. अंगोलाच्या पाठिंब्याबद्दल आणि आफ्रिकन युनियनने हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल त्यांचे आभार मानत पंतप्रधानांनी   “आम्ही दहशतवादी तसेच  त्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यास वचनबद्ध आहोत,” यांचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधानांच्याच भावना व्यक्त करताना, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आंतरराष्ट्रीय पाठिंब्याची नोंद घेतली. “जागतिक समुदायाने जोरकसपणे एकजुटीने प्रतिसाद दिला आहे,” असे ते म्हणाले.

भारताकडून प्रतिहल्ला होण्याच्या शक्यतेबाबत पाकिस्तान हाय अलर्टवर असल्याने, अधिकृत सूत्रांनी पुष्टी केली आहे की सशस्त्र दलांना संपूर्ण कामगिरीविषयक स्वेच्छाधिकार देण्यात आले आहेत. “पंतप्रधानांनी लष्कराला प्रतिसाद देण्याची वेळ, पद्धत आणि व्याप्ती निश्चित करण्याचे अधिकार दिले आहेत,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसमावेशक सुरक्षा आढाव्याच्या बैठकीत या आदेशाची पुष्टी करण्यात आली. बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते.

टपाल सेवा निलंबित करणे, पाकिस्तानी आयात आणि नौवहन यावर बंदी यासारख्या मुत्सद्दी उपाययोजनांच्या समांतर भारत सर्व क्षेत्रांमध्ये आपली लष्करी स्थिती मजबूत करत आहे. 3 ते 7 मे दरम्यान, भारतीय नौदल युद्ध सज्जता प्रमाणित करण्यासाठी आणि वास्तववादी परिस्थितीत प्रमुख नौदल प्रणालींची चाचणी घेण्यासाठी अरबी समुद्रात live-fire exercises करत आहे.

नौदलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सराव भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रात आयोजित केला जात असून कोणत्याही संशयास्पद हालचाली झाल्याच तर आघाडीच्या युद्धनौका हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. गुजरात किनाऱ्यावरील एका नियुक्त क्षेत्रासाठी चार वेळा नौदल इशारा देण्यात आला आहे, जो पाण्यापासून फक्त ८५ नॉटिकल मैल अंतरावर आहे जिथे पाकिस्तान याच कालावधीत स्वतःचे नौदल सराव करत आहे.

भारतीय तटरक्षक दलाने देखील मुख्यत्वे करुन आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळील सागरी क्षेत्रांमध्ये तैनाती वाढवली आहे. या प्रदेशातून जाणाऱ्या व्यावसायिक जहाजांना निर्धारित सराव क्षेत्रांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, अनेक निरीक्षक नवी दिल्लीकडे एक संकेत म्हणून पाहत असताना, पाकिस्तानने शनिवारी आपल्या अल्प पल्ल्याच्या अब्दाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आल्याचे जाहीर केले. 450 किलोमीटरच्या अंतरावर पारंपरिक आणि अण्वस्त्रे दोन्ही वाहून नेण्यास सक्षम असलेल्या या चाचणीचे वर्णन पाकिस्तानच्या लष्कराने क्षेपणास्त्राची अचूकता आणि कुशलता प्रमाणित करण्याच्या उद्देशाने “नियमित प्रशिक्षण सरावाचा” एक भाग म्हणून केले होते.

18 व्या शतकातील अफगाण शासक अहमद शाह अब्दालीच्या नावावरून या क्षेपणास्त्राचे नाव ठेवण्यात आले आहे.

भारताच्या लष्करी डावपेचांच्या आणि पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र चाचणीच्या संयोजनामुळे जागतिक स्तरावर चिंता निर्माण झाली आहे. अनेक देशांनी दोघांनाही संयम राखण्याचे तसेच आणखी तणाव वाढणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

टीम भारतशक्ती


+ posts
Previous articleBhutan’s Gelephu City: Sustainable, Strategic—and India-Led
Next articleभारतीय संरक्षण कंपनी BEL ब्राझीलमध्ये कार्यालय उघडणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here