कॅनडा पोर्टमधील हॅमिल्टन शहरात, दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात, 21 वर्षीय भारतीय विद्यार्थिनी हरसिमरत रंधावा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हॅमिल्टन पोलिसांच्या माहितीनुसार, रंधावा बसस्थानकावर बसची वाट पाहत असताना, अचानक दोन वाहनांमधून एकमेकांवर गोळीबार सुरु झाला, ज्यातील एक गोळी दुर्देवाने रंधावा हिली लागली.
ओंटारियोतील हॅमिल्टनमध्ये असलेल्या मोहॉक कॉलेजात शिकणारी रंधावा, आपल्या कामावर जात असताना ही घटना घडली.
गेल्या चार महिन्यांत कॅनडामध्ये मृत्यू पावलेली रंधावा ही चौथी भारतीय नागरिक आहे.
टोरांटोमधील भारतीय वाणिज्यदूतावासाने या घटनेबाबत शोक व्यक्त केला असून, रंधावा ही निष्पाप होती आणि तिला चुकून गोळी लागल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे.
“भारतीय विद्यार्थिनी हरसिमरत रंधावा हिच्या दुर्दैवी मृत्यूविषयी आम्हाला खेद आहे. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, दोन वाहनांमध्ये झालेल्या गोळीबारात ती एक निष्पाप बळी ठरली. सद्यस्थितीत याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. आम्ही तिच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत आणि त्यांना आवश्यक ती सर्व मदत करत आहोत,” असे वाणिज्यदूतावासाने X प्लॅटफॉर्मवरून सांगितले.
हॅमिल्टन पोलिसांनी सांगितले की, “ही घटना Upper James आणि South Bend Road परिसरात घडली. रंधावा हिला छातीत गोळी लागली होती, तिला तातडीने रुग्णालयातही नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.”
CCTV फुटेजमध्ये दिसले की, एका काळ्या कारमधील व्यक्तीने पांढऱ्या सिडान कारमधील लोकांवर गोळीबार सुरू केला आणि क्रॉस फायरिंग नंतर दोन्ही वाहने घटनास्थळावरून पसार झालीय पोलिसांनी सांगितले की, ” बंदुकीच्या काही गोळ्या जवळच्या एका घराच्या खिडकीत घुसल्या, मात्र कोणीही जखमी झाले नाही.”
चार महिन्यांत, चार मृत्यू
हरसिमरत रंधावाच्या मृत्यूपूर्वी, गेल्या काही महिन्यांत कॅनडामध्ये भारतीय नागरिकांवर प्राणघातक हल्ला झाल्याच्या विविध घटना घडल्या आहे.
1 डिसेंबर रोजी, पंजाबमधील लुधियाना येथील 22 वर्षीय पदव्युत्तर विद्यार्थिनी गुरासिस सिंग, हिच्यावर कॅनडातील तिच्या भाड्याच्या घरात चाकूने वार करण्यात आले होते.
त्याच महिन्यात, पंजाबमधील आणखी एक 22 वर्षीय विद्यार्थिनी रितिका राजपूत हिचा, बोनफायर दरम्यान अंगावर खोड पडून मृत्यू झाला.
6 डिसेंबर रोजी, भारतीय वंशाचा सुरक्षा रक्षक असलेल्या 20 वर्षीय हर्षदीप सिंगला, एडमंटनमध्ये एका टोळीने गोळ्या घालून ठार मारले.
या अलीकडच्या घटनांच्या मालिकेमुळे कॅनडामधील द्वेषाधारित गुन्हेगारी व हिंसाचारात वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात असून, भारतीय अधिकाऱ्यांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे.
(IBNS च्या इनपुट्ससह)