रशिया-युक्रेन संघर्षात दिसलेल्या पद्धतींचे प्रतिबिंब असलेल्या धोरणात्मक बदलात, पाकिस्तानने 8-9 मेच्या रात्री भारतीय हवाई हद्दीत 500 हून अधिक कमी किमतीच्या, कच्च्या ड्रोनचा मारा केला आणि लडाखमधील लेहपासून गुजरातमधील सर क्रीकपर्यंतच्या विस्तीर्ण पट्ट्यातील 36 लष्करी आणि मोक्याच्या ठिकाणांना लक्ष्य केले. यातील बहुतेक ड्रोन निःशस्त्र होते आणि सहजपणे अडवले जात असले तरी, तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की हल्ल्यांमागील हेतू साधा सरळ नव्हता.
लष्करी विश्लेषकांच्या मते, या हल्ल्यांचा उद्देश थेट नुकसान करणे हा नव्हता, तर भारतीय हवाई संरक्षण संसाधने संपवणे, अभेद्यता तपासणे आणि रडार कव्हरेज तसेच प्रतिसाद वेळेचा संभाव्य नकाशा तयार करणे हे यामागचे धोरण होते. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने भारतशक्तीला सांगितले की, “ही केवळ हवाई हद्दीतील घुसखोरी नव्हती तर आपल्या संरक्षण यंत्रणेवर दबाव आणणे, सैन्याकडे असणारी साधने खर्च करणे आणि यांच्याशी संबंधित डेटा गोळा करण्यासाठी हे एक सुनियोजित पाऊल होते.
हे धोरण युक्रेनमध्ये रशियाच्या इराण निर्मित शाहेद ड्रोनच्या वापराशी लक्षणीय साम्य दाखवणारे आहे, जे पाश्चात्य देशांनी पुरवलेल्या हवाई संरक्षण प्रणालींवर मात करण्यासाठी अनेकदा समूहांमध्ये प्रक्षेपित केले जातात. सामान्यतः अचूकता कमी असली तरी, हे हल्ले उच्च खर्च आणि त्या तुलनेत कमी लाभ अशा गुणोत्तरासह येतात. महाग इंटरसेप्टर क्षेपणास्त्रे संपवून टाकणे आणि लॉजिस्टिकल ऊर्जा नष्ट करणे.
पाकिस्तानने जम्मू, श्रीनगर, पठाणकोट, अमृतसर, भटिंडा, आदमपूर यासारख्या प्रमुख भारतीय लष्करी केंद्रांवर आणि अगदी दक्षिणेकडील भुज आणि सर क्रीकपर्यंतच्या तळांवरही चिनी व्यावसायिक दर्जाचे किंवा स्थानिक पातळीवर सुधारित ड्रोन तैनात केले, ज्यात तुर्की निर्मित एसिसगार्ड सोंगर यूएव्हीचा समावेश होता.
या टोळ्यांमध्ये लहान क्वाडकॉप्टर्स, मोठे यू. ए. व्ही. आणि ठराविक अंतराने उडणाऱ्या ड्रोन समूहांना मार्गदर्शन करणारे मदर ड्रोन यांचा समावेश होता. फॉरेन्सिक तपासणीनुसार, अनेक ड्रोनमध्ये कोणतीही स्फोटके नव्हती तर केवळ दगडांच्या गोळ्या किंवा रिकाम्या आवरणे होती. यातून असे सूचित होते की ही घुसखोरी थेट हल्ल्यांऐवजी हेरगिरी आणि इलेक्ट्रॉनिक तपासणीसाठी होती.
“आमची हवाई संरक्षण रचना-रडारची स्थिती, चकमकीची क्षेत्रे आणि प्रतिसादाची रणनीती-आम्ही सक्रिय आणि उघड करावी अशी पाकिस्तानची इच्छा होती,”असे एका संरक्षण सूत्राने म्हटले आहे. “भविष्यातील मोठ्या युद्धासाठी महत्त्वपूर्ण माहिती गोळा करण्याची ही एक युक्ती आहे.”
ड्रोनसह नियंत्रण रेषेवरील 20 ठिकाणी जोरदार गोळीबार करण्यात आला याला कर्नल सोफिया कुरेशी यांनी दुजोरा दिला. “हा एक समन्वित संकरीत हल्ला होता. आमच्या सैन्याने धोक्याला निष्प्रभ करण्यासाठी kinetic आणि non kinetic अशा दोन्ही क्षमतांनी प्रत्युत्तर दिले,” असे त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
भारताने 70 हून अधिक ड्रोन (20 ‘सॉफ्ट’ आणि 50 ‘हार्ड’ किल) पाडण्यासाठी किंवा निष्क्रिय करण्यासाठी L-70 and ZU-23mm guns, Schilka platforms, DRDO’s electronic warfare suites, and jamming technologies अशा मिश्र प्रणाली तैनात केल्या. अनेक ड्रोन्स हे प्रत्त्युत्तर टाळल्यानंतर पाकिस्तानी हद्दीत परतले.
कमी किमतीचे, उच्च प्रमाणात व्यत्यय आणणारे ड्रोन, ज्यांचे वर्णन ‘ऑफ-द-शेल्फ’ किंवा ‘गॅरेज-मॉडिफाइड’ असे केले जाते, त्यांना नष्ट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रे किंवा गोळ्यांचा खर्च त्यापेक्षा कितीतरी पट जास्त असतो. एका अधिकाऱ्याने परिस्थितीचे स्पष्टपणे वर्णन केलेः “ते 2 कोटी रुपयांच्या प्रतिसादांना चालना देण्यासाठी 10 हजार रुपयांचे ड्रोन वापरत आहेत. त्यामुळे आता हे आर्थिक युद्ध आहे.”
पश्चिम कॉरिडॉरच्या पलीकडे प्रत्यक्षदर्शींनी प्रकाशाची चमक, ध्वनी स्फोट आणि कमी उंचीवर उडणाऱ्या वस्तू बघितल्याचे सांगितले, ज्यामुळे नागरी भागात घबराट पसरली. लुधियाना आणि जालंधरसारख्या शहरी केंद्रांमध्ये हवाई हल्ल्यांचे सायरन काही काळासाठी सक्रिय करण्यात आले होते आणि जम्मूमध्ये ते अनेक तासांसाठी ब्लॅकआऊट करण्यात आला होता.
संवेदनशील भागांमध्ये पोहोचण्यापूर्वी बहुतेक ड्रोन निष्प्रभ करण्यात आले होते, तर काहींनी पायाभूत सुविधांचे किरकोळ नुकसान केले. अवंतीपोराजवळ एका लष्करी आस्थापनेला लक्ष्य करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.
नागरिकांचे नुकसान आणि तणावात सातत्याने वाढ
ड्रोनच्या घुसखोरीदरम्यान पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर तोफखाना आणि तोफगोळ्यांचे हल्लेही केले. या स्फोटात दोन भारतीय नागरिक ठार झाले आणि तीन जखमी झाले, ज्यामुळे या आठवड्याच्या सुरुवातीला तणाव वाढण्यास सुरुवात झाल्यापासून मृतांची संख्या 18 वर पोहोचली.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माचिल येथे दोन शाळकरी मुलांना गमवावा लागलेला जीव,एका प्राथमिक शाळेजवळ तोफगोळा पडल्याने एका कॉन्व्हेंटला झालेल्या नुकसानाची माहिती दिली. “ही केवळ लष्करी चिथावणी नाहीत. हे नागरिकांच्या जीवनावर आणि प्रार्थनास्थळांवर करण्यात आलेले हल्ले आहेत,” असे ते म्हणाले.
भारताचा प्रतिसाद
प्रतिहल्ला म्हणून, भारतीय सशस्त्र ड्रोनने अनेक पाकिस्तानी लष्करी स्थानकांवर हल्ला केला, ज्यामुळे लाहोरमधील हवाई संरक्षण रडार निकामी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भारताने सुरक्षेच्या कारणास्तव कर्तारपूर कॉरिडॉरवरील ऑपरेशन्स स्थगित करून तीव्र राजनैतिक निषेध नोंदवला.
भारतीय अधिकाऱ्यांनी फ्लाइट ट्रॅकिंग डेटा देखील शेअर केला जो दर्शवितो की पाकिस्तानने या संपूर्ण कामगिरी दरम्यान त्यांचे नागरी हवाई क्षेत्र खुले ठेवले होते – हे पाऊल म्हणजे शत्रुत्वाच्या कारवायांमध्ये नागरी विमानांचा कव्हर म्हणून वापर करण्याचा प्रयत्न म्हणून अर्थ लावला जात होता.
“ही एक धोकादायक आणि निंदनीय चाल आहे. पाकिस्तानने केवळ भारतीय हवाई क्षेत्राचेच उल्लंघन केले नाही तर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक नियमांचेही उल्लंघन केले आहे,” असे कर्नल कुरेशी म्हणाल्या.
हायब्रीड संघर्षातील एक नवीन अध्याय
ड्रोन हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या दृष्टिकोनात संभाव्य सैद्धांतिक बदल दिसून येतो: पारंपरिक सीमापार चकमकींपासून ते तंत्रज्ञानाने सक्षम, कमी खर्चाच्या, असमान युद्धापर्यंत ज्याचा उद्देश पाळत ठेवणे, व्यत्यय आणणे आणि धोरणात्मक संदेश देणे आहे.
भारताच्या संरक्षण आस्थापनेने याची दखल घेतली आहे. “ही एक धोक्याची घंटा आहे,” एका अधिकाऱ्याने सांगितले. “युद्धक्षेत्र विकसित होत आहे, आणि त्याचप्रमाणे आपले प्रतिकारक उपाय – वेग, प्रमाण आणि रणनीतीमध्ये देखील तसे बदल झाले पाहिजेत.”
रवी शंकर आणि हुमा सिद्दीकी