भारतीय सशस्त्र दलांच्या क्षमतेत क्रांती घडवून आणण्यासाठी UAS सज्ज

0
UAS

संघर्षमय लढाईला ड्रोन पुन्हा आकार देत आहेत. या मानवरहित प्रणालींमुळे झालेला विध्वंस रशिया-युक्रेन संघर्षात बघायला मिळाला आहे. सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीजने ((CAPS) मानवरहित हवाई प्रणाली (UAS) या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. लष्कर आणि उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

संरक्षण मंत्रालयाने हे वर्ष ‘सुधारणांचे वर्ष‘ म्हणून साजरे केले जाईल अशी घोषणा केल्यामुळे, सशस्त्र दल आणि उद्योग क्षेत्र हे दोघेही आजच्या आणि भविष्यातील समस्या सोडवण्यासाठी एकत्र काम करत आहेत. सध्याच्या तंत्रज्ञान-नेतृत्वाखालील रिव्होल्यूशन ऑफ मिलिटरी अफेअर्सच्या (RMA) केंद्रस्थानी ड्रोन असल्याचे म्हटले जाते.

युक्रेनमधील या मानवरहित प्रणालींच्या वर्चस्वामुळे पारंपरिक संघर्ष अपारंपरिक झाला आहे. ज्याप्रमाणे बंदुकीतील गोळ्यांच्या मारामुळे महायुद्धातील सैनिकांना खंदकांमध्ये घुसण्यास भाग पाडले होते, त्याचप्रमाणे ड्रोनच्या सुरू असणाऱ्या माऱ्यामुळे आताच्या संघर्षावरही असाच परिणाम झाला आहे. शिवाय,  UAS अनेकदा विमानांची आणि काही प्रकरणांमध्ये (अचूक) तोफखान्याची भूमिका बजावत आहे.

भारतीय सशस्त्र दले या नवीन प्रणालींमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. गेल्या वर्षी 2 हजारांहून अधिक ड्रोन खरेदी करण्यासाठी सैन्याने मागील वर्षाच्या मध्यापर्यंत 4 कोटी 20 लाख डॉलर्स इतका खर्च केल्याचे वृत्त आहे. हे ड्रोन विविध प्रकारच्या भूमिका पार पाडतात, जसे की हेरगिरी, लॉजिस्टिक वितरित करणे आणि इतर सामरिक ऑपरेशन्स.

भारतीय हवाई दलाने अलीकडेच शस्त्र प्रणाली शाखा सुरू केली आहे. या शाखेला मानवरहित प्रणालींसह इतर प्रकारची सामुग्री जसे की पृष्ठभाग-ते-पृष्ठभाग आणि पृष्ठभाग-ते-हवा मार्गदर्शित शस्त्रे हाताळण्याचे काम सोपवण्यात आले आहे. भारतीय लष्कर आणि नौदल देखील आक्रमक आणि बचावात्मक अशा दोन्ही प्रकारच्या मोहिमांसाठी त्यांच्या विद्यमान तुकड्यांमध्ये UAS समाकलित करण्यासाठी सातत्याने काम करत आहेत.

तिन्ही दले देशांतर्गत उद्योगाकडे या व्यासपीठाचा पुरवठादार म्हणून पाहत आहेत. सध्या सुरू असलेल्या संघर्षांनी संरक्षणातील स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सशस्त्र दले आणि उद्योग यांच्यातील संबंध आता भागीदारीत विकसित होत आहेत.

या मानवरहित प्रणालींची मागणी वाढणे अपेक्षित आहे आणि उद्योग क्षेत्राकडून आता अशा दोन्ही प्रणालींचे नाविन्य, विकास आणि उत्पादन करणे अपेक्षित आहे जे आपल्या दलांना या क्षेत्रातील जागतिक घडामोडींशी सुसंगत ठेवेल.

टीम भारतशक्ती


+ posts
Previous articlePoKतील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आवाहन
Next articleअहवालानुसार, इस्रायली मंत्रिमंडळाची गाझावरील व्यापक कारवाईला मंजुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here