“ऑपरेशन सिंदूर” मध्ये भारताच्या हवाई संरक्षणाची दमदार कामगिरी

0

आधुनिक युद्धातील अति जोखमीच्या खेळामध्ये, आता केवळ लढाऊ विमानांचेच हवाई वर्चस्व नसून, ते शत्रूपेक्षा वेगाने लक्ष्याकडे पाहण्याची, त्याला रोखण्याची आणि त्यावर हल्ला करण्याच्या क्षमतेत आहे. भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण जाळ्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नुकत्याच झालेल्या सीमेपलीकडील संघर्षादरम्यान हे तंतोतंत दाखवून दिले. या प्रणालीने  अत्याधुनिक चिनी आणि तुर्की तंत्रज्ञानावर चालणाऱ्या शत्रूच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा यशस्वीरित्या हाणून पाडला.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवरील भारताच्या पूर्वनियोजित हल्ल्याला पाकिस्तानने मानवरहित हवाई प्रणाली आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनी प्रत्युत्तर दिले, तेव्हा भारताचे बहुस्तरीय हवाई संरक्षण जाळे खऱ्या अर्थाने गेम चेंजर म्हणून पुढे आले. कार्यात्मक यशापेक्षा, हे कृतीतील deterrence-by-denial चे प्रात्यक्षिक होते.

चीन आणि तुर्कीचे युद्ध तंत्रज्ञान, पाकिस्तानचा मारा

पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांमध्ये त्यांनी आतापर्यंत वापरलेल्या काही सर्वात प्रगत हवाई शस्त्रांचा समावेश होता. त्यापैकी PL-15E हे J-10C लढाऊ विमानांनी सोडण्यात आलेले दृकश्राव्य अंतराच्या पलीकडचे चिनी क्षेपणास्त्र होते. हायपरसॉनिक आणि रडार-मार्गदर्शित, या संघर्षातील त्याच्या युद्धभूमीतील पदार्पणाने धोरणात्मक समुदायामध्ये धोक्याची घंटा वाजवली.

या पार्श्वभूमीवर एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले की, “हे केवळ प्रतीकात्मक नव्हते-ते तांत्रिक प्रगती दाखवणारे होते. “PL-15Eचा उद्देश केवळ हल्ला करणे हा नव्हता, तर आपल्या उच्च मूल्याच्या मालमत्तेला आव्हान देणे हा होता.”

भारतीय रडार प्रणालींना गोंधळात टाकण्याच्या आणि मोठ्या संख्येने संरक्षणावर मात करण्याच्या आशेने पाकिस्तानने तुर्कीची loitering munitions आणि कमी किमतीची क्वाडकॉप्टर्स देखील तैनात केली. मात्र , याला शक्ती-गुणोत्तर प्रतिसाद मिळाला ज्याने रडार कव्हरेज, स्तरित अवरोधन आणि सामरिक लवचिकता एकत्रित केली.

बहुस्तरीय, बहु-डोमेन संरक्षण

भारताचा प्रतिसाद संयुक्त युद्ध तत्त्वांच्या पुस्तकात दिलेल्या अंमलबजावणीपेक्षा कमी नव्हता. सुरुवातीच्या चेतावणी प्रणाली – AWACS, एरोस्टॅट्स आणि जमिनीवर आधारित रडार – शेकडो किलोमीटर अंतरावरील प्रक्षेपणांचा मागोवा घेत होत्या. प्रतिसादात, प्लॅटफॉर्मचा एक स्पेक्ट्रम सक्रिय झाला: आकाश आणि पेचोरा SAM ने मध्यम-श्रेणीच्या धोक्यांना रोखले, तर S-400 बॅटरीने मोठ्या प्रमाणात हवाई क्षेत्राचे रक्षण केले. L-70 आणि ZU-23-2 तोफा, MANPADS सोबत, पॉइंट ॲसेट्सचे रक्षण करत होत्या.

पण शस्त्रास्त्रांच्या पलीकडे, खरा विजय होता तो या प्रणालींचा एकमेकांशी ज्याप्रकारे ताळमेळ साधला गेला त्यामध्ये.

एअर कमोडोर टी. के. चॅटर्जी (निवृत्त) यांनी स्पष्ट केले की, “भारताचे यश केवळ चांगल्या यंत्रसामग्रीमध्ये नव्हते तर ते सेन्सर्स, नेमबाज आणि निर्णय घेणाऱ्यांमध्ये वास्तविक वेळेत समन्वय साधण्याच्या क्षमतेत होते”. “नेटवर्किंगमुळे प्रतिक्रिया आणि अपेक्षा यात फरक पडतो.”

भारतीय हवाई दलापेक्षाही भव्य: संपूर्ण भारतासाठी हवाई ढाल

भारताचा प्रतिसाद डिझाइन आणि गरजेनुसार तिहेरी होता. सैन्याच्या हवाई संरक्षण कॉर्प्सने सैन्य आणि प्रमुख क्षेत्रांचे संरक्षण करण्यासाठी क्वाड्राट आणि तुंगुस्का सारख्या मोबाइल प्रणाली तैनात केल्या. ड्रोनच्या झुंडी पाडण्यासाठी पायदळाने हलक्या मशीन गन आणि कार्ल गुस्ताफ एअरबर्स्ट राउंड्सचा वापर केला – नवीन तंत्रज्ञानाच्या युद्धभूमीसाठी पुन्हा वापरण्यात आलेली ही जुनीच युक्ती होती.

समुद्रात, आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत यांनी बराक-8 इंटरसेप्टर्स आणि CIWS प्रणालींसह सागरी क्षेत्रांवर हवाई संरक्षणाचा विस्तार केला. “पाकिस्तानी हवाई घटक वाहक युद्ध गटापासून बरेच दूर राहिले,” असे व्हाइस ॲडमिरल एएन प्रमोद म्हणाले. “आम्ही त्यांना संधीही दिली नाही.”

डिजिटल पाठबळ: C2 ची कामगिरी

भारताच्या कमांड अँड कंट्रोल (C2) पायाभूत सुविधांमुळे संरक्षण एकसंध बनवले गेले. नियंत्रण आणि अहवाल केंद्रे (सीआरसी) यांनी बीएसएफ ग्राउंड इनपुट, आयएएफ रडार फीड्स आणि नौदल सेन्सर डेटा यांनी एकत्रितपणे धोक्याच्या या काळात एकजुटीने चेताकेंद्रे म्हणून काम केले.

“येथे हवाई संरक्षण राष्ट्रीय संरक्षण बनते,” असे लेफ्टनंट कर्नल मनोज के. चन्नन (निवृत्त) म्हणाले. “तुम्ही आता फक्त एअरबेस किंवा जहाजाचे रक्षण करत नाही आहात – तुम्ही एकमेकांशी जोडलेल्या मालमत्तेच्या ग्रिडचे रक्षण करत आहात, लहान लहान भाग आता एकत्रित जोडले जाऊन मोठा परिणाम करत आहेत.”

धोरणात्मक परिणाम: संरक्षणाद्वारे प्रतिबंध

पाकिस्तानी प्रक्षेपणांचे मोठे प्रमाण आणि त्यात विविधता असूनही, भारताचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. भटिंडाजवळ सापडलेल्या राफेलच्या अवशेषांची चौकशी सुरू असताना, प्राथमिक मूल्यांकनातून शत्रूच्या कारवाईत तांत्रिक बिघाड असल्याचे दिसून येते. जवळजवळ शून्य-नुकसानाचा हा रेकॉर्ड पाकिस्तानच्या नुकसानीच्या अगदी विरुद्ध आहे – उपग्रह प्रतिमांद्वारे पुष्टी केल्याप्रमाणे, नूर खान आणि रहिमयार खान येथील त्याच्या हवाई तळांवर अचूक हल्ले झाले.

तरीही, भारताने संयम राखला. “आमचे उद्दिष्ट कधीही वाढले नव्हते – ते तटस्थ होते,” असे एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले.

सीमांपलीकडे संदेश

या संघर्षामुळे भारत आणि पाकिस्तानच्या वेगवेगळ्या होत असलेल्या संरक्षण परिसंस्थांनाही मोठा दिलासा मिळाला. पाकिस्तानने आपल्या संरक्षण साधनसामुग्रीसाठी – युएव्ही, लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांसाठी – आपला मोर्चा जवळजवळ पूर्णपणे चीनकडे वळवले आहे. दरम्यान, भारताने आकाश, क्यूआरएसएएम आणि एलआर-एसएएम सारख्या प्रकल्पांतर्गत स्वदेशी विकासाला चालना देत फ्रान्स, इस्रायल आणि अमेरिकेसोबत धोरणात्मक भागीदारीकडे झुकत आहे.

एका पाश्चात्य राजनैतिक अधिकाऱ्याच्या निरीक्षणानुसार, “भारताने केवळ क्षेपणास्त्रे रोखली नाहीत – तर त्यांनी एक संदेशही पाठवला. त्यांनी दाखवून दिले की ते आधुनिक नेटवर्क आणि अचूक शक्तीने स्वतःचे रक्षण करू शकते. ते केवळ प्रतिबंधकतेपेक्षा जास्त आहे – ही धोरणात्मक परिपक्वता आहे.”

आता लक्ष भविष्याकडे: शील्ड मजबूत करणे

तरीही,यात काही त्रुटी आहेत. भारताचा हवाई पूर्वसूचना देणारा ताफा मर्यादित आहे आणि सोव्हिएत काळातील प्रणालींवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अधिक स्वदेशी प्लॅटफॉर्मची आवश्यकता आहे. अर्थात, ऑपरेशन सिंदूरमधील कामगिरीविषयक धडे अर्थातच जलद एकात्मता आणि अपग्रेडसाठी संस्थात्मक प्रोत्साहन देऊ शकतात.

एक गतिमान सिद्धांत

ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांसाठी नव्हे तर भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने थांबवलेल्या हल्ल्यांसाठी लक्षात ठेवले जाऊ शकते. भारताचे हवाई संरक्षण ग्रिड केवळ प्रतिक्रियाशील नव्हते तर ते भाकित करणारे, पूर्वसूचक आणि अचूक होते. असे केल्याने, त्यांनी केवळ भारतीयांचे जीवन आणि मालमत्तेचे रक्षण केले नाही तर शिस्तीसह प्रतिबंधकतेच्या सिद्धांताला देखील बळकटी दिली.

हायब्रिड युद्धाच्या विकसित होत असलेल्या परिस्थितीत, अवकाशाचे रक्षण करणे आता त्यांच्याद्वारे हल्ला करण्याइतकेच शक्तिशाली संदेश असू शकते.

हुमा सिद्दिकी


+ posts
Previous articleHotline Diplomacy Prevails: India, Pakistan Suspend Military Operations
Next articleहॉटलाइनचा मुत्सद्देगिरीसाठी वापर: भारत पाकिस्तान लष्करी हल्ले स्थगित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here