काश्मीर हल्ल्याचे Sanitising केल्याबद्दल HAF ने पाश्चात्य माध्यमांना फटकारले

0

द हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने (HAF) काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या धार्मिकतेचं  ‘खेदजनक आणि जाणीवपूर्वक’ निर्मूलन’ केल्याबद्दल पाश्चात्य वृत्तवाहिन्यांना फटकारले आहे.

हिंदू धर्माच्या लोकांना निवडकपणे लक्ष्य करण्यात आलेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्यात, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाचा प्रतिनिधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ शी संबंधित दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांना ठार मारले.

HAF च्या कार्यकारी संचालक सुहाग शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या घटनेला दिलेल्या वागणुकीला लक्ष्य करत एक गंभीर निवेदन जारी केले.

“ते दहशतवादाला कमी लेखतात. त्यात सुधारणा करा. पीडितांची धार्मिक ओळख लपवा. दहशतवाद्यांना ‘अतिरेकी’ म्हणा. ‘दहशतवादी हल्ला’ उपहासात्मक अवतरणांमध्ये ठेवा. ही केवळ एक शोकांतिका नाही, तर जाणूनबुजून केलेले दुर्लक्ष आहे,”  असे त्या म्हणाल्या.

“चला यावर अधिक प्रकाश टाकू या,” असेही  त्या म्हणाल्या. “लष्कर-ए-तोयबाची शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटच्या दहशतवाद्यांनी पहलगाममधील पठारावर घुसून किमान 26 पर्यटकांची हत्या केल्याची जबाबदारी घेतली. हिंदूंचा अचूकपणे शोध घेत, 2008 सालापासून काश्मीरमधील हे सर्वात भीषण नागरी हत्याकांड होते.”

“हेडलाईन्स खरंतर सरळ होत्या, पण प्रसारमाध्यमांनी त्यात आपल्याला हवे तसे बदल केले.”

शुक्ला म्हणाले की हल्ल्याच्या स्वरूपामुळे कोणतीही संदिग्धता खरंतर उरली नव्हती.

“हेडलाईन्स अशा हव्या होत्या: पाकिस्तान समर्थित गटाने याची जबाबदारी घेत केलेल्या दहशतवादी हल्ल्यात इस्लामवाद्यांनी काश्मीरमध्ये हिंदूंची कत्तल केली,” असे त्या म्हणाल्या.

त्याऐवजी द न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन, बीबीसी, रॉयटर्स आणि असोसिएटेड प्रेस यासारख्या प्रमुख माध्यम संस्थांनी याला सौम्य रुप दिले किंवा ती बातमी विकृत केली आहे, असंही त्या म्हणाल्या.

त्यांच्या मते, “संपूर्ण मंडळात, तुम्हाला ‘दहशतवादी हल्ला’ आणि मारेकऱ्यांचे अतिरेकी म्हणून sanitised केलेले उपहासात्मक कोट्स दिसतील. “काहींनी त्यांना बंडखोर म्हणण्याचीही औकात दाखवून दिली. एक उदाहरण देते: एक बंडखोर अधिकाऱ्यांशी लढतो, एक अतिरेकी राज्याला लक्ष्य करतो आणि एक दहशतवादी वैचारिक किंवा धार्मिक उद्दिष्टांसाठी भीती पसरवण्यासाठी जाणूनबुजून नागरिकांना लक्ष्य करत ठार करतो.”

 धर्म विचारून हत्या

प्रत्यक्षदर्शींच्या नोंदीचा हवाला देत, शुक्ला यांनी अधोरेखित केले की हत्या वैचारिकदृष्ट्या प्रेरित होत्या.

दहशतवाद्यांनी पीडितांना त्यांचा धर्म सांगण्याची मागणी केली-त्यांना ओळखपत्र दाखवण्यास किंवा कलमा पठण करण्यास भाग पाडले-आणि जर ते हिंदू असतील तर त्यांची हत्या केली. द्वेषाचा संदेश देण्यासाठी त्यांनी जाणूनबुजून त्यांच्या पत्नी आणि मुलांना सोडले,” असे त्या म्हणाल्या.

बीबीसीने पीडितांचे वर्णन ‘गैर-मुस्लिम’ असे केल्याने ही एक विशिष्ट गोष्ट होती ज्याने त्यांचा संताप वाढला.

त्यांनी याला जाणूनबुजून परिणाम कमी करण्याची कृती म्हटले.

‘या मागचा हेतू जितका जुना आहे तितकाच स्पष्ट आहेः वैचारिक आणि धार्मिक युद्धासाठी हिंदूंना लक्ष्य करणे, त्यांची हत्या करणे आणि त्यांना घाबरवणे. कृपया आम्हाला तटस्थ राहणाऱ्या अटी मिटवून टाकून मोकळे करा,” असेही  शुक्ला म्हणाल्या.

हिंदूविरोधी हिंसाचाराला लक्ष्य केले

शुक्ला यांनी असा युक्तिवाद केला की पहलगाम हत्याकांड हा काश्मीरमधील हिंदूविरोधी हिंसाचाराच्या व्यापक आणि चालू असलेल्या पद्धतीचा एक भाग आहे, ज्याकडे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी एकतर दुर्लक्ष केले आहे किंवा ते सौम्य करून मांडले आहे.

1980 आणि 90 च्या दशकात 3 लाख 50 हजारांहून अधिक काश्मिरी पंडितांचे जबरदस्तीने पलायन, तसेच अमरनाथ आणि वैष्णोदेवीसारख्या धार्मिक स्थळांवर हिंदू यात्रेकरूंच्या लक्ष्यित हत्यांचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, “पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून काश्मीरमधील हिंदूंवर होणारे हल्ले दुर्मिळ किंवा यादृच्छिक नाहीत.”

2019 मध्ये कलम 370 रद्द करण्यापूर्वी काश्मीरमधील हिंदूंविरुद्ध पद्धतशीर भेदभाव होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “त्यापूर्वी, स्थानिक हिंदू पंडितांना, ज्यांना आधीपासूनच वांशिकदृष्ट्या शुद्ध केले गेले होते, त्यांना मालमत्ता परत मिळविण्यास कायदेशीररित्या मनाई होती.

“काश्मिरी स्त्रियांनी बाहेरील लोकांशी लग्न केल्यास त्यांच्या मुलांना मालमत्ता देऊ शकत नव्हत्या. प्रदेशाबाहेरील भारतीय तेथे स्थायिक होऊ शकले नाहीत “, असे त्यांनी नमूद केले. आणि तरीही एपी तसेच रॉयटर्स तिथे परत येऊ इच्छिणाऱ्यांचे वर्णन ‘बाहेरील’ असे करतात? पेनसिल्व्हेनियाला जाणाऱ्या कॅलिफोर्नियाच्या व्यक्तीला ते स्थलांतरित म्हणतील का?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.

LeT चे TRF वर नियंत्रण

शुक्ला यांनी लष्कर-ए-तोयबा आणि द रेझिस्टन्स फ्रंट यांच्यातील कार्यभागाविषयी असणाऱ्या लिंकची सविस्तर माहिती दिली.

“पाकिस्तानची गुप्तचर संस्था त्यांना पैसे देते, प्रशिक्षण देते आणि निर्देश देते. TRF च्या फाल्कन पथकाला पाकिस्तानातील LeT शिबिरांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. त्यांचे प्रचार यंत्र LeT च्या नेटवर्कवर चालते-हे सर्व इस्लामाबादचा भारतविरोधी, हिंदूविरोधी अजेंडा पुढे नेण्यासाठी चालते,”  असे त्या म्हणाल्या.

‘जुन्या माध्यमांच्या भूमिकेमुळे दहशत निर्माण होते’

आपल्या समारोप भाषणात शुक्ला यांनी सार्वजनिक मतांना आकार देण्यात आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या भूमिकेवर कठोर आरोप केले.

“मोठ्या मीडियाचे व्हाईटवॉशिंग आणि स्पिन केवळ पीडितांचा अपमान करत नाही. ते या अत्याचारांमागील शक्तींना सक्षम करते,” असेही त्या म्हणाल्या. “तुम्ही दहशतवाद कशासाठी म्हणू शकत नसाल तर कदाचित तुम्ही त्याबद्दल अजिबात वार्तांकन करू नये.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleव्यापार युद्ध संपवण्यासाठी चीनचे अमेरिकेला Tariff रद्द करण्याचे आवाहन
Next articlePahalgam: हल्ल्यात सहभागी दोन LeT च्या दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here