FAKE News पासून सावधान! INS Vikrant आणि मुनीरविषयी खोटी माहिती

0
FAKE News

पाकिस्तानक समर्थित टीव्ही चॅनेल्सपासून ते यूट्यूब आणि सोशल मीडियापर्यंत सर्वत्र, दहशतवादाविरुद्ध भारताच्या लढ्याचे वारंवार आणि व्यापक प्रसारण झाले. मात्र यामध्ये FAKE News सुळसुळाटही पाहायला मिळाला. पाकिस्तानकडून कुठल्याही पुराव्याशिवाय, तथ्यहिन माहिती आणि व्हिडीओ व्हायरल केले गेले.

Operation Sindoor च्या पहिल्याच दिवशी, 5 भारतीय विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा खळबळजनक दावा समोर आला. भारताने यावर काही काळ मौन बाळगल्यामुळे, ‘चीनने पाकिस्तानला दिलेल्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टममुळे भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांचे जीपीएस जॅम झाले,’ असा त्यांनी केलेला दुसरा दावा प्रबळ वाटू लागला.

सोशल मीडियावर एका भारतीय लढाऊ विमानाच्या अपघाताचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल केले गेले. मात्र भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने स्पष्ट केले की, ‘हे फोटो सप्टेंबर 2024 मध्ये राजस्थानमधील बाडमेर येथे कोसळलेल्या मिग-29 विमानाचे होते.’

मात्र दुसऱ्या दिवशी, पाकिस्तानने कुठलाही ठोस पुरावा न देता, असंबद्ध दावे केल्यामुळे हे लक्षात आले, की त्यांचा प्रोपोगंडा खोटा असून, भारताविरुद्ध युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानकडून जनमानसाची करण्यात आलेली एक मोठी दिशाभूल मोहीम होती.

पाकिस्तानकडून सोशल मीडियावर आणखी एक खळबळजनक दावा करण्यात आला की– गुजरातमधील हजीरा बंदरावर  हल्ल्या झाला. याचा फेक व्हिडिओही व्हायरल झाला. मात्र, PIB ने हे स्पष्ट केले की, ‘हा व्हिडिओ जुलै 2021 मधील एका तेलवाहू टँकरच्या स्फोटाचा आहे.’

*हा व्हिडिओ कृपया व्हायरल करु नये, तर त्यामगील सत्य जाणून घ्यावे- pic.twitter.com/nlQwgVAj3k

Anshul Saxena (X हँडल @askanshul) यांनी, सोशल मीडियावरील अशाच एका व्हिडीओची पोलखोल केली आहे, ज्यामध्ये दिसणारी एक व्यक्ती भारतीय लष्करातील असल्याचा दावा करत, पाहलगाममधील हल्ला हा भारतानेच केलेला “फॉल्स फ्लॅग ऑपरेशन” असल्याचे म्हटले आहे.
@askanshul यांनी निदर्शनास आणून दिले की, “फॉल्स फ्लॅग” हा शब्द भारतातील माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांनीच तयार केला होता. यानंतर त्यांनी हा दावा करणाऱ्या व्यक्तीचा पर्दाफाश केला – कराचीतील PIB कॉलनीतील कंजी मलिक ही ती व्यक्ती असून, त्याचे पाकिस्तानी लष्कराशी संबंध आहेत.
अर्थात, हे खेळ दोन्ही बाजूंनी खेळले जाऊ शकतात. @arungolaya यांनी @official_kpt यांचा एक फेक दावा शेअर केला आहे, ज्यात म्हटले आहे की, “भारतीय हल्ल्यानंतर कराची पोर्टला मोठे नुकसान झाले असून, संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.”
हा दावा भारतीय बाजूकडून पाकिस्तानचा आत्मविश्वास खच्ची करण्यासाठी मुद्दाम पसरवलेला असू शकतो का? हे ठामपणे सांगता येणार नाही. मात्र गोलया आणि अनेकांना असे वाटते की याची स्वतंत्रपणे शहानिशा होणे गरजेचे आहे.

सध्या सुरू असलेला संघर्ष, युक्रेनमधील परिस्थितीचे प्रतिबिंब वाटतो, जिथे मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला जात आहे. याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर दिशाभूल करणारी माहितीही पसरवली जात आहे. हेच आधुनिक युद्धाचे नवीन स्वरूप असल्याचे दिसत आहे.

– टीम स्ट्रॅटन्यूज


+ posts
Previous articleभारत-चिली यांची CEPA साठी करारावर स्वाक्षरी; व्यापार संबंधांना चालना
Next articleEscalate or De-escalate, Pakistan Army Chief’s Dilemma

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here