तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानचे अरबी समुद्रात Live-Fire Drills

0

पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 25 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षणीयरित्या वाढला आहे. पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर व्यापक राष्ट्रीय आक्रोश निर्माण झाला असून आणि लष्करी कारवाई होण्याची भीती वाढली आहे.

दोन्ही देशांकडून आता समुद्रात Live-Fire Drills सुरू झाल्याने लष्करी सज्जतेचा स्पष्ट संकेत म्हणून त्याकडे बघता येईल. गुरुवारी, भारतीय नौदलाचे सर्वात नवीन मार्गदर्शित क्षेपणास्त्र विध्वंसक, आयएनएस सुरतने अरबी समुद्रात उच्च सज्जता कवायतीदरम्यान त्याच्या Medium-Range Surface-to-Air Missile (MRSAM) प्रणालीचा वापर करून सागरी-स्किमिंग लक्ष्याचा यशस्वीपणे सामना केला.

त्याच वेळी, पाकिस्तानने 24 आणि 25 एप्रिल रोजी अरबी समुद्रात क्षेपणास्त्र चाचण्यांसाठी NOTAM (Notice to Airmen) जारी केली आहे. पाकिस्तानच्या किनारपट्टीला आणि विशेष आर्थिक क्षेत्राला (EEZ) समांतर असलेल्या विशाल क्षेत्रामध्ये पसरलेले निर्देशांक, live-fire नौदल सरावाचे क्षेत्र चिन्हांकित करतात ज्यात क्षेपणास्त्र प्रक्षेपण कवायती समाविष्ट आहेत.

पाकिस्तानी नौदलाने व्यापक लष्करी सतर्कतेदरम्यान या सरावाला सुरूवात केल्याच्या वृत्ताला संरक्षण सूत्रांनी दुजोरा दिला आहे. पाकिस्तानी हवाई संरक्षण सक्रिय करण्यात आले असून सीमेजवळील भारतीय हवाई हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी AWACS विमाने नियमितपणे उड्डाणे करत आहेत.

पहलगाम हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानी भूदल आधीच पश्चिम सीमेजवळ सुरू असलेल्या लष्करी सरावात गुंतले होते, असेही सूत्रांनी उघड केले. तेव्हापासून भारतीय गुप्तचर यंत्रणांनी नियंत्रण रेषेवर (LoC) वाढलेल्या पाकिस्तानी लष्करी हालचालींवर लक्ष ठेवले आहे.

आपल्या पहिल्या सार्वजनिक प्रतिसादात भारताने या हल्ल्यात सहभागी असणारे दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना योग्य ते शासन देण्याचे वचन दिले. गुरुवारी बिहारमधील एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलीः

“भारत प्रत्येक दहशतवाद्याला, त्याच्या समर्थकांना आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांची ओळख पटवून, त्यांचा पाठलाग करेल आणि शिक्षा करेल. आम्ही पृथ्वीच्या टोकापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवादाला शिक्षा होणारच.”

भारताचे सुरुवातीचे उपाय राजनैतिक पण निर्णायक राहिले आहेत. 1960 चा सिंधू जल करार स्थगित करणे हे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. जोपर्यंत पाकिस्तान विश्वासार्हतेने आणि अपरिवर्तनीयपणे सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत हा करार स्थगित राहील, असे सरकारने म्हटले आहे. तात्काळ परिणाम जरी मर्यादित असले, तरी पाकिस्तानच्या दृष्टीने त्याचे दीर्घकालीन धोरणात्मक परिणाम लक्षणीय आहेत.

याशिवाय इतर  उपाययोजनांमध्ये अटारी येथील सीमा तातडीने बंद करणे आणि पाकिस्तानी नागरिकांसाठीची सार्क व्हिसा सूट योजना ((SVES) रद्द करणे यांचा समावेश आहे. यापूर्वी जारी केलेले सर्व SVES व्हिसा रद्द करण्यात आले असून या योजनेअंतर्गत सध्या भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला माघारी जाण्यास 48 तासांची मुदत देण्यात आली असल्याचे परराष्ट्र सचिवांनी बुधवारी जाहीर केले.

एका तीव्र मुत्सद्दी निर्णयांतर्गत, भारताने नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षणविषयक सल्लागारांना  देश सोडण्यासाठी एक आठवडा दिला आहे. त्याचप्रमाणे इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील आपल्या लष्करी सल्लागारांना मायदेशी बोलवण्यात आले आहे. 1 मेपासून दोन्ही उच्चायुक्तालयांची क्षमता सध्याच्या 55 कर्मचाऱ्यांवरून 30 कर्मचाऱ्यांपर्यंत घटविण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने (CCS) राष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला असून सर्व संरक्षण दलांना जास्तीत जास्त दक्षता राखण्याचे निर्देश दिले आहेत.

पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवादी आणि त्यांचे समर्थक यांचा योग्य तो निवाडा करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाप्रमाणेच, भारत दहशतवाद्यांचा आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा सतत पाठलाग करत आहे,” यावर परराष्ट्र सचिवांनी भर दिला.

याशिवाय, एक प्रतीकात्मक डिजिटल पाऊल उचलत, भारत सरकारने भारतातील पाकिस्तानी सरकारच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) खातेही प्रतिबंधित केले आहे.

टीम भारतशक्ती  


+ posts
Previous articleसिंधू नदीचे पाणी थांबवल्यावर पाकिस्तान युद्ध करू शकेल का?
Next articleIndia Hits Hard: Indus Waters Treaty Scrapped

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here