पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा बळी गेल्यानंतर अण्वस्त्रधारी शेजारी देशांमध्ये तणाव वाढत असताना, पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा आणि पूंछ भागातील नियंत्रण रेषेवर (LoC) रविवारी सलग चौथ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
पाकिस्तानी गोळीबाराला त्वरित आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर दिल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे.
27 आणि 28 एप्रिल 2025 च्या रात्री पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यांत नियंत्रण रेषेच्या त्या भागातून अकारण गोळीबार सुरू झाला. भारतीय सैन्याने त्याला त्वरित आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले,”असे भारतीय लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी त्या हल्ल्यामागील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कारवाई तीव्र केली आहे.
दहशतवादाला आळा घालण्याच्या आणि त्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्याच्या दिशेने सुरू असणाऱ्या प्रयत्नांमध्ये सुरक्षा दलांनी गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवाद्यांच्या घरांवर बॉम्बहल्ले केले आहे.
पहलगाम हल्ला
22 एप्रिल रोजी, पहलगामच्या निसर्गरम्य बैसरन पठारावर दहशतवाद्यांनी तिथल्या पर्यटकांवर केलेल्या सर्वात प्राणघातक दहशतवादी हल्ल्यांपैकी एका हल्ल्यात 26 पुरुषांना, मुख्यतः हिंदू पर्यटकांना गोळ्या घालून ठार केले.
यातून बचावलेल्यांनी सांगितले की बंदूकधाऱ्यांनी काही पर्यटकांना त्यांच्या धर्माविषयी विचारले आणि त्यांनी इस्लामी श्लोकांचे पठण करण्याची मागणी केली. जे यात अयशस्वी झाले किंवा ज्यांनी याला नकार दिला, त्यांच्या डोक्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की किमान पाच दहशतवादी लहान गटांमध्ये विभागले गेले आणि त्यांनी पठारावरील तीन भागांवर हल्ला केला.
दहा मिनिटांपेक्षा कमी काळ चाललेल्या या हल्ल्यात 25 पर्यटक आणि एका स्थानिक पोनी ऑपरेटरसह 26 जणांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये गुप्तचर विभागाचे (आयबी) एक अधिकारी, भारतीय नौदलाचा एक लेफ्टनंट आणि भारतीय हवाई दलाचा (आयएएफ) एक कॉर्पोरल यांचा समावेश आहे – जे त्यांच्या कुटुंबियांसोबत सुट्टी घालवायला तिथे गेले होते.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)