भारतीय हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी स्फोटांमुळे लाहोर हादरले

0

कालच भारताने केलेल्या Operation Sindoor नंतर भारत-पाकिस्तान तणाव वाढला असताना, पाकिस्तानस्थित जिओ टीव्ही, रॉयटर्सच्या एका प्रत्यक्षदर्शी आणि सोशल मीडिया पोस्टनुसार, गुरुवारी सकाळी लाहोरमध्ये स्फोटांच्या मालिकेचे आवाज ऐकू आले.

मात्र स्फोट नेमके कोणत्या कारणांमुळे झाले याची कोणतीही त्वरित माहिती मिळाली नाही.

दहशतवादी पायाभूत सुविधांवर हल्ला

काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 हिंदू पर्यटक  ठार झाले. यामागे पाकिस्तान असल्याचे सिद्ध झाल्यानंतर दोन आठवड्यांनी, काल म्हणजे बुधवारी पहाटे भारताने पाकिस्तानमधील “दहशतवादी पायाभूत सुविधांवर” हल्ला केला.

इस्लामाबादने हा आरोप फेटाळून लावला असून क्षेपणास्त्र हल्ल्याचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. भारताची आपण  पाच भारतीय विमाने पाडल्याचा त्याने दावा केला आहे. मात्र या बातम्या म्हणजे “चुकीची माहिती” असल्याचे भारताने म्हटले आहे.

मोठी जीवितहानी

दरम्यान, पाकिस्तानने सांगितले की त्यांच्यावर झालेल्या हवाई हल्ल्यात आणि त्यानंतर झालेल्या सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात किमान 31 नागरिक ठार झाले असून सुमारे 50 जण जखमी झाले, तर भारताने म्हटले की त्यांच्या 13 नागरिकांचा मृत्यू झाला आणि 43 जण जखमी झाले.

भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी सीमेपलीकडून होणारा गोळीबार आता कमी झाला आहे.

भारताने पाकिस्तानच्या सीमेजवळील भागात ब्लॅकआउट ड्रिल देखील केले. यात अमृतसर शहराचाही समावेश होता. त्यांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देता येणे शक्य होईल.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये बहुतांश शहरांमध्ये काही प्रमाणात  परिस्थिती पूर्वपदावर आली असून  शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु सीमावर्ती पंजाब प्रांतात, रुग्णालये आणि नागरी संरक्षण अधिकारी अजूनही पराकोटीची सतर्कता बाळगून आहेत.

तणाव कमी करण्याच्या दृष्टीने पाकिस्तान प्रयत्नशील

भारताच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचे पाकिस्तानी सरकारने आश्वासन दिले असले तरी, संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी बुधवारी द न्यूयॉर्क टाईम्सला सांगितले की पाकिस्तान तणाव कमी करण्यास तयार आहे.

जर पाकिस्तानने “प्रतिसाद दिला तर ते “प्रतिसाद दिला जाईल” असे भारताने म्हटल्यानंतर, जागतिक शक्तींनी तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले की त्यांना आशा आहे की दोन्ही देश तणावपूर्ण संबंधांवर “तोडगा शोधतील” आणि जर आपली मदत  फायदेशीर ठरणार असेल तर  आपण  “तिथे असू.”

1947 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण आहेत. या देशांमध्ये तीन युद्धे लढली गेली आहेत, त्यापैकी दोन युद्धे काश्मीरवरून झाली आहेत.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) निधी मिळण्यापूर्वी 2023 मध्ये बाह्य कर्जाच्या संदर्भात डिफॉल्ट होण्याच्या उंबरठ्यावर आणलेल्या आर्थिक संकटातून अजूनही सावरत असताना पाकिस्तानच्या 350 अब्ज डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेला सध्याच्या तणावात झालेली वाढ फारशी झेपणारी नाही.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

 


+ posts
Previous articleOperation Sindoor: चीनकडून ऑपरेशनचा ‘खेदजनक’ असा उल्लेख
Next articleअथेन्सच्या प्रदर्शनात कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सचा स्टॉल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here