दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमुळे जम्मू-काश्मीरच्या तुरुंगांची सुरक्षा वाढवली

0
दहशतवादी
5 मे 2028 रोजी श्रीनगरमध्ये दक्षिण काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर एका रस्त्यावर भारतीय सुरक्षा दलाचा जवान पहारा देत आहे. (रॉयटर्स/शराफत अली)

संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या वृत्तानंतर जम्मू आणि काश्मीरमधील तुरुंगांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.गुप्तचरांनी दिलेल्या  माहितीनुसार, श्रीनगर मध्यवर्ती तुरुंग आणि जम्मूमधील कोट बलवाल तुरुंग यासारखे उच्च-सुरक्षा व्यवस्था असणारे संभाव्य लक्ष्य असू शकतात, असे इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

अनेक हाय-प्रोफाइल दहशतवादी आणि स्लीपर सेलचे सदस्य सध्या याच तुरुंगांमध्ये बंदिस्त आहेत.

सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले की, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महासंचालकांनी रविवारी श्रीनगरमधील सुरक्षा ग्रिडच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीदरम्यान हा इशारा जारी करण्यात आला आहे.

भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्यांना कडक संदेश दिला आणि सशस्त्र दलांसोबत काम करणे आणि देशावर हल्ला करण्याचे धाडस करणाऱ्यांना योग्य उत्तर देणे ही माझी जबाबदारी असल्याचे सांगितले.

“संरक्षणमंत्री म्हणून माझ्या सैनिकांसह देशाच्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही माझी जबाबदारी आहे,” असे सिंह यांनी संस्कृती जागरण महोत्सवाला संबोधित करताना सांगितले.

ते पुढे म्हणाले: “देशावर हल्ला करण्याचे धाडस करणाऱ्यांना योग्य उत्तर देणे ही देखील माझी जबाबदारी आहे.”

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सिंह यांनी भाष्य केले.

भारतीय हवाई दल प्रमुखांनी घेतली मोदींची भेट

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाचे प्रमुख एपी सिंह यांनी रविवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

युएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली.

भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी शनिवारी मोदी यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे.

मोदी यांनी गेल्या आठवड्यात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचीही भेट घेतली होती. या बैठकींबद्दल कोणताही अधिकृत अहवाल माध्यमांना देण्यात आला नाही.

तथापि, 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याला प्रतिसाद देण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेचा हा एक भाग म्हणून या  सगळ्या भेटींकडे बघितले जात आहे. पहलगामच्या निसर्गरम्य बैसरन पठारावर दहशतवाद्यांनी तिथल्या पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात 26 पुरुषांना, मुख्यतः हिंदू पर्यटकांना गोळ्या घालून ठार केले.

2019 च्या पुलवामा घटनेनंतर काश्मीर खोऱ्यात झालेल्या सर्वात घातक हल्ल्यांपैकी हा एक होता.

मोदींनी ‘प्रत्युत्तर देण्यासाठी स्वातंत्र्य’ दिले
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे की भारताचा प्रतिसाद निर्णायक असेल.

29 एप्रिल रोजी उच्च संरक्षण आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मोदींनी सशस्त्र दलांना प्रतिसादाची वेळ आणि स्वरूप निश्चित करण्यासाठी “पूर्ण स्वातंत्र्य” दिले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleजागतिक विमान कंपन्यांचा Pakistani Airspace टाळण्याचा निर्णय
Next articleDRDO, Indian Navy Successfully Validate Multi-Influence Ground Mine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here