जम्मू सीमेवरील पाकच्या घुसखोरीला BSF चे प्रत्युत्तर; 7 दहशतवाद्यांना कंठस्नान

0
BSF

जम्मूतील सांबा जिल्ह्यात पाकिस्तानकडून झालेल्या मोठ्या घुसखोरीचा प्रयत्न, BSF ने उशिरा गुरुवारी रात्री हाणून पाडला. यामध्ये किमान 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि पाकिस्तान रेंजर्सची एक पोस्ट उद्ध्वस्त करण्यात आली, अशी माहिती बीएसएफने शुक्रवारी सकाळी दिली.

ही घुसखोरी 8 आणि 9 मे, 2025 च्या मध्यरात्री झाल्याचे सांगण्यात आले आहे.

बीएसएफची पुष्टी

“जम्मू फ्रंटियर बीएसएफच्या सांबा सेक्टरमध्ये 8 आणि 9 मे च्या मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला, जो आमच्या निगराणी यंत्रणेद्वारे त्वरित पकडला गेला,” असे बीएसएफने आपल्या निवेदनात सांगितले.

“या घुसखोरीसाठी पाकिस्तान रेंजर्सच्या ‘धंधर’ पोस्टकडून गोळीबाराचे समर्थन करण्यात आले. सतर्क बीएसएफ जवानांनी या प्रयत्नाला हाणून पाडले आणि किमान 7 दहशतवाद्यांचा खात्मा केला तसेच ‘धंधर’ पोस्टचे मोठे नुकसान केले,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी, या घटनेबाबत X द्वारे पोस्ट करत लिहीले की:  “8 आणि 9 मे 2025 च्या मध्यरात्री, जम्मू आणि काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफने मोठा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. किमान सात दहशतवादी ठार मारले आणि पाकिस्तानच्या धंधर पोस्टला मोठे नुकसान पोहचवले.”

पाककडून ड्रोन-मिसाईल हल्ले

जम्मू आणि काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटनस्थळावर, दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’  जारी केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाक-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

गुरुवारी, भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानकडून डागलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्रे निष्प्रभ केली, जे भारतातील अमृतसर, जम्मू, पठाणकोट आदी अनेक शहरांना लक्ष्य करत होती.

“7-8 मे २०२५ च्या रात्री पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज अशा उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांना ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला,” असे भारतीय लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

“हे सर्व हल्ले इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स प्रणालीद्वारे निष्प्रभ करण्यात आले. या हल्ल्यांचा मोडतोड झालेला अवशेष वेगवेगळ्या ठिकाणी सापडत आहे, जे पाकिस्तानी हल्ल्याचे पुरावे आहेत,” असेही निवेदनात नमूद आहे.

भारताकडून पाकिस्तानच्या एअर डिफेन्स प्रणालीवर हल्ला

भारतीय संरक्षण मंत्रालयाने म्हटले की, “भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी असलेल्या एअर डिफेन्स रडार्स आणि प्रणालींना लक्ष्य केले.”

“भारतीय प्रत्युत्तरही त्याच क्षेत्रात आणि तीव्रतेने दिले गेले. विश्वासार्ह माहितीनुसार, लाहोरमधील एक एअर डिफेन्स प्रणाली निष्प्रभ करण्यात आली आहे,” असे निवेदनात सांगण्यात आले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)


+ posts
Previous article30 दिवसांचा युद्धविराम प्रगतीच्या दिशेने एक पाऊल: Zelenskyy
Next articleभारत-चिली यांची CEPA साठी करारावर स्वाक्षरी; व्यापार संबंधांना चालना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here