पहिल्या ग्लोबल साउथ AI शिखर परिषदेसाठी, भारताची जय्यत तयारी

0
इंडिया–AI

जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशासन या संकल्पनेत स्वतःला एक प्रमुख आयोजक म्हणून स्थान देत, भारत 15 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत, नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘इंडिया–AI इम्पॅक्ट परिषद 2026‘ चे आयोजन करणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या, ‘इंडिया AI मिशन’ अंतर्गत आयोजित या शिखर परिषदेच्या निमित्ताने; यापूर्वी ब्लेचली पार्क, सोल, पॅरिस आणि किगाली येथे आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय समिट मालिकेचे, प्रथमच ‘ग्लोबल साउथ’ मध्ये आयोजन केले जात आहे.

जागतिक AI संवादाला विस्तृत वचनबद्धतेपासून – मोजता येण्याजोग्या निष्कर्षांकडे नेण्यासाठी डिझाईन केलेल्या या परिषदेची चौकट, ‘People, Planet and Progress’ या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आहे.

या तत्त्वांची कार्यवाही, सात विषयक कार्यगटांद्वारे किंवा “चक्रांद्वारे” केली जाते, ज्यामध्ये मानवी भांडवल, सामाजिक सक्षमीकरणासाठी समावेशकता, सुरक्षित आणि विश्वासार्ह AI प्रणाली, लवचिकता आणि नवोपक्रम, विज्ञान, AI संसाधनांचे लोकशाहीकरण तसेच आर्थिक वाढ आणि सामाजिक कल्याणासाठी AI चा वापर, या घटकांचा समावेश आहे.

कार्यगटांच्या बैठका ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत- गुवाहाटी, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, मुंबई, भुवनेश्वर आणि कानपूर यांसारख्या भारतीय शहरांमध्ये, हायब्रीड स्वरूपात आयोजित केल्या जातील.

परिषदेच्या तयारीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पाच फेऱ्यांच्या चर्चांचा समावेश आहे, आणि MyGov मार्फत 600 हून अधिक नागरिकांचे प्रतिसाद आणि पॅरिस, बर्लिन, ओस्लो, न्यूयॉर्क, जिनिव्हा, बँकॉक आणि टोकियो येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर संपर्क साधणे समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, परिषदेपूर्वी भारत आणि परदेशात 50 हून अधिक संबंधित AI कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत, ज्यामध्ये जगभरातील देशांची सराकारे, विद्यापीठे, संशोधन संस्था, नागरी समाज गट आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांकडून एकूण 375 अर्ज प्राप्त झाले आहेत.

सहभाग वाढवण्यासाठी आणि व्यावहारिक उपाययोजनांना प्राधान्य देण्यासाठी, शिखर परिषदेत अनेक महत्त्वाचे उपक्रम असतील. यामध्ये ‘युवाई – ग्लोबल यूथ चॅलेंज’, ‘AI बाय HER – ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज’, ‘AI फॉर ऑल – ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज’ आणि स्टार्टअप्ससाठी ‘उडान – ग्लोबल एआय पिच फेस्ट’ यांचा समावेश आहे.

16 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत, एक मोठे ‘AI इम्पॅक्ट प्रदर्शन’ (AI Impact Expo) भरवले जाईल, ज्यामध्ये विविध सरकारे, उद्योग आणि स्टार्टअप्सद्वारे सादर केलेले अर्ज आणि नवोपक्रम प्रदर्शित केले जातील. 18 फेब्रुवारी रोजी AI आणि त्याच्या प्रभावावर समर्पित संशोधन परिसंवाद आयोजित केला जाईल, ज्यामध्ये भारत, ग्लोबल साउथ आणि आंतरराष्ट्रीय संशोधकांचे कार्य प्रदर्शित केले जाईल.

तात्पुरत्या कार्यक्रमाची सुरूवात, 15 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक दिनाने होईल, त्यानंतर तीन दिवस अन्य महत्त्वाचे कार्यक्रम आयोजित केले जातील. 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या, मुख्य शिखर परिषदेच्या सत्रांमध्ये लीडर्सचे पूर्ण अधिवेशन, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज बैठक, GPAI परिषद बैठक, पॅनेल चर्चा, प्रमुख भाषणे आणि तज्ञांच्या स्तरावरील गोलमेज चर्चा यांचा समावेश असेल.

शिखर परिषदेच्या लोगो (चिन्ह) संदर्भात, MyGov वर घेण्यात आलेल्या देशव्यापी स्पर्धेत सुमारे 600 लोकांनी सहभाग घेतला. अंतिम लोगो विजेत्या डिझाईनमधील घटक घेऊन तयार करण्यात आला आहे, तो “सर्वजन हिताय | सर्वजन सुखाय” अर्थात “सर्वांच्या कल्याणासाठी, सर्वांच्या आनंदासाठी” या ब्रीदवाक्याशी सुंसगत आहे.

प्रवेश, सुरक्षितता, नवोपक्रम आणि न्याय्य उपयोजनावर लक्ष केंद्रित करून ‘इंडिया–AI इम्पॅक्ट समिट 2026’, भारताच्या AI विकासाला, समावेशनाला आणि जागतिक सहकार्याला मोठ्या प्रमाणावर कसे पुढे नेता येऊ शकते, हे दर्शवण्याचा प्रयत्न करेल.

मूळ लेखक- रामानंद सेनगुप्ता

+ posts
Previous articleभारत–नेपाळ संयुक्त लष्करी सराव ‘सूर्यकिरण XIX’ यशस्वीरित्या संपन्न
Next articleचकमकींदरम्यान चिनी विमानांना रडारवर लक्ष्य केल्याचे जपानने नाकारले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here